अहमदनगर : अकोले तालुक्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांच्या ताफ्यावर शाईफेकीची घटना घडली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा कार्यकर्ता शर्मिला येवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या गाड्यांच्या ताफ्यावर अतिशय शाई फेकून निषेध केला.

शासनाने महापोर्टल बंद केले, अकोले तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

अकोले येथे सुगाव शिवारात रोकडोबा मंदिराजवळ शुक्रवारी सकाळी महाजनादेश यात्रा आली होती.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष शर्मिला येवले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिशेने शाई फेकली.
यापूर्वीही या महिलेने जालना येथे फडणवीस यांच्या सभेत गोंधळ घातला होता. या महिलेनेच पुन्हा अकोले येथे मुख्यमंत्र्यांवर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रकार पोलिसांनी हाणून पाडला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळात बेरोजगार तरुणांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत, याबाबत कुठलीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही.
नागरिकांच्या उपयोगाचे महापोर्टल बंद करण्यात आले. तसेच अकोले तालुक्यातून वैभव पिचड यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली.
- IBPS Clerk Prelims चा रिजल्ट लवकरच जाहीर होणार ! कसा अन कुठं पाहणार निकाल, कधी होणार मुख्य परीक्षा ? वाचा डिटेल्स
- ब्रेकिंग : 2026 मध्ये सोन्याचे रेट आणखी वाढणार ! 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार ? तज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
- महाराष्ट्रातील ‘हे’ ज्युनिअर कॉलेज झाले बंद ! विद्यार्थ्यांना बारावी बोर्ड परीक्षेचा फॉर्म भरता येणार नाही, वाचा डिटेल्स
- 15 नोव्हेंबरला बँका बंद राहणार की नाही ? समोर आली मोठी अपडेट
- Pm किसान च्या 21व्या हफ्त्याची अधिकृत तारीख जाहीर ! कृषी मंत्रालयाने सांगितली तारीख













