अहमदनगर: नेते, खासदार व आमदार सोडून चालल्यामुळे राजकीय अस्तित्व संकटात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे येत्या मंगळवारपासून महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार असून शुक्रवारी (दि.२०) ते नगरला मुक्कामी येणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मंगळवार (दि.१७) पासून शरद पवार दौऱ्यावर निघणार आहेत. सोलापुरात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची पहिली बैठक होणार आहे.

पहिल्या टप्प्यात सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर व सातारा जिल्ह्यात बैठका घेऊन ते पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
भाजप-शिवसेनेकडे जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांना थोपवणे व पक्षात अजूनही असलेल्यांना विश्वास देणे हाच या दौऱ्याचा मुख्य हेतू असल्याचे बोलले जात आहे. शक्रवारी (दि.२०) जालना आणि औरंगाबाद येथे बैठका घेऊन ते नगरला मुक्कामा येणार आहेत.
शनिवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता ते नगरमध्ये पक्षाचे आजी माजी आमदार, खासदार, पक्षाचे आजी माजी पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, नगरसेवक तसेच सहकार क्षेत्रातील जाणकारांशी संवाद साधणार आहेत
- मालदीवसाठी बजेट प्लॅन करताय? फक्त ₹1000 रुपयांमध्ये काय काय करता येतं, जाणून घ्या!
- भारतात ‘या’ 5 कर्करोगाने वाढवली चिंता, पुरुषांसाठी शेवटचा प्रकार ठरतोय जीवघेणा!
- क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारे फक्त 5 फलंदाज, यादीत धोनी-सचिनचे नावच नाही!
- भारतीय एअर फोर्सचं जगात कितवं स्थान?, हवाई ताकदीत कोण आहे सर्वात पुढे? पाहा टॉप-5 देशांची यादी
- Relationship Tips : कडाक्याचं भांडण झालंय, पण तुम्हाला नातंही टिकवायचंय?, ‘हा’ सल्ला तुमचं नातं आणखी घट्ट करेल!