पैठण : जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरताच धरण प्रशासनाने रविवारी (दि.१५) सायंकाळी सहा वाजता धरणाचे चार दरवाजे व त्यानंतर रात्री ११.३० वाजता आणखी ८ असे एकूण १२ दरवाजे अध्र्या फुटाने वर उचलून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
सध्या धरणात १७ हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू असून महिन्याभरात सलग दुसऱ्यांदा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. दि. १५ ऑगस्ट रोजी धरणाची पाणीपातळी ९२ टक्के झाली असता धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले होते.

त्यांनतर आज (दि. १५ सप्टेंबर) रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरताच जायकवाडी प्रशासनाने धरणाचे बारा दरवाजे अध्र्या फुटाने उचलून पाण्याचा विसर्ग गोदापात्रात करण्यात येत आहे.
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी Good News ! राज्यातील ‘या’ 2 महत्त्वाच्या रेल्वे मार्गांना केंद्रातील सरकारची मंजुरी
- आठव्या वेतन आयोगाबाबत केंद्रातील मोदी सरकारकडून सभागृहात मोठी माहिती ! नव्या वेतन आयोगाचे कामकाज कुठवर आलं ?
- ऑगस्ट महिना ठरणार सुपर लकी!’या’ 5 मूलांकांवर सूर्यदेव व राहू करणार धन, यश आणि संधींचा वर्षाव
- ब्रेकिंग ! 1 ऑगस्ट 2025 पासून ‘हे’ 5 नियम बदलणार, थेट सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार
- मृत्यूनंतर मालमत्तेचा खरा वारसदार कोण असतो?, नामनिर्देशित व्यक्ती की कायदेशीर वारस? वाचा कायदा काय सांगतो!