सातारा :- देशात रोजगार नाहीत त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. याकडे डोळेझाक करून भाजप सरकार काश्मीरमधील ३७० कलमासारखे भावनिक मुद्दे उपस्थित करून जनतेची दिशाभूल करीत आहे.
हे त्यांनी थांबवावे आणि नथुराम गोडसे हा देशभक्त होता की आतंकवादी होता हे जाहीर करावे, असे आव्हान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात आज आर्थिक मंदी आहे, रोजगार उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री हे जनतेला दिवास्वप्न दाखवत सुट आहेत, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अधिकाधिक जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
- आषाढी एकादशीच्या निमित्ताने नेवाश्यात ज्ञानोबा माऊली जयघोषाने परिसर दुमदुमला, पैसे खांबांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी
- कोपरगाव तालुक्यात आगामी निवडणुकीत काळे-कोल्हे सत्तासंघर्ष तीव्र होणार, शिवसेना ठरणार गेमचेंजर?
- सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण ! 7 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत ?
- साईभक्तांसाठी बांधण्यात आलेल्या ‘त्या’ दोन इमारतीसंदर्भात साई संस्थानचा पाठपुरावा सुरू, विखेंची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावणार
- साईभक्तांसाठी महत्वाची बातमी! गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त शिर्डीतील ‘ब्रेक दर्शन’ सेवा तात्पुरती ठेवण्यात येणार बंद