बीड :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी होमग्राऊंड बीडमध्ये तुफान फटकेबाजी केली.“जे कावळे होते ते गेले. मात्र पवारसाहेब तुमच्यावर प्रेम करणारे मावळे सोबत आहेत.
छत्रपती उदयनराजे गेल्यानंतर धक्का बसला. छत्रपती पंताला शरण गेले”, असं म्हणत धनंजय मुंडेंनी उदयनराजेंवर सडकून टीका केली.

मधुकर पिछड यांच्या दुसऱ्या पत्नी आदिवासी नाहीत, ज्यांनी बोगस आदिवासीचं प्रमाणपत्र काढून 1500 कोटीचा भ्रष्टाचार केला, असा घणाघात धनंजय मुंडेंनी केला.
विनायक मेटे महजनादेश यात्रेच्या बसवर चढले आणि खेळ झाला. मंत्री रुसून गेल्या, असं म्हणत त्यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली.
जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत गेले. इथे रोजगार नव्हता म्हणून ते गेले. आष्टीचं बेणं भाजपात गेलं, असं म्हणत त्यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
“शरद पवार साहेबांनी प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांच्यासह अन्य मागासवर्गीय नेत्यांना खुल्या जागेतून आमदार- खासदार केलं. भाजपचं आता विभाजन झाले आहे.
ज्या बबनराव पाचपुते यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले, त्यांनाच भाजपात घेऊन पवित्र केलं. मुख्यमंत्री आधी बबन्या म्हणायचे, आता बबनराव पाचपुते असं नाव घेतात”, अशी टोलेबाजी धनंजय मुंडे यांनी केली.
- IAS, IPS ते क्लर्क ; आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर कोणाचा पगार किती वाढणार? वाचा डिटेल्स
- अहिल्यानगर ब्रेकिंग ! विखे पाटलांकडून ऑपरेशन लोटस…जिल्हा परिषद निवडणुकीआधीच महाविकास आघाडीला धक्का
- आठवा वेतन आयोग : रंजना प्रकाश देसाई बनल्यात नव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा, कोण आहेत देसाई ? पहा…
- वारसदाराची परवानगी न घेता वडिलोपार्जित जमीन किंवा मालमत्ता विकू शकतो का ? कायदेतज्ञांनी दिली मोठी माहिती
- ब्रेकिंग ! सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण, आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला अधिकृतरित्या मंजुरी मिळाली













