मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी एकूण दीडशेच्या वर साक्षीदार साक्ष देण्यास तयार झाले असून सध्या त्यांच्या जबान्या नोंदवून घेण्याचे काम पोलीस अधिकारी करीत आहेत.
हे साक्षीदार या बँकेचे घटक असून त्यांनीच बँकेच्या वतीने ग्रामीण भागातील अनेकांना कर्जाचे वाटप केले होते. कोणाकोणाला या कर्जाची रक्कम मिळाली, याचाही शोध पोलीस घेत आहेत. या साक्षीदारांचे जाबजबाब नोंदवून घेतल्यानंतर या प्रकरणातील प्रमुख आरोपींना चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.

आरोपींत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे नेते जयंत पाटील, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आदी बड्या नेत्यांचा समावेश आहे. या भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी असल्यामुळे त्याचा तपास मुंबई अन्वेषण विभागाच्या आर्थिक घोटाळा शाखेचे अधिकारी करीत आहेत.
- रोज आवडीने इन्स्टंट नूडल्स खाताय?, मग ही बातमी नक्की वाचा! सत्य ऐकून हादरून जाल
- जपान दरवर्षी 2000 भूकंपांना कसा तोंड देतो?, ‘या’ 10 गोष्टींमुळे हा देश अजूनही सुरक्षित! मजबूत यंत्रणेचं जगभर होतं कौतुक
- महाराष्ट्रातील ‘या’ 3 राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण केले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा केंद्राकडे पाठपुरावा सुरु
- न बोलताही भावना ओळखतात, लोक आपोआप त्यांच्यासमोर मन मोकळं करतात! अंक 2 चे लोक इतके खास का असतात?
- मेकअप करण्यापूर्वी चुकूनही गुलाब जल लावू नका, चुकीच्या पद्धती त्वचेला पोहोचवतात हानी! जाणून घ्या योग्य वापर