अहमदनगर : काटवन खंडोबा रोड परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेने पकडला. शुक्रवारी सायंकाळी केलेल्या कारवाईत पोलिसांनी टाटा कंपनीचा ट्रक व दोन ब्रास वाळू जप्त केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात रवी संजय बर्डे (वय २३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, काटवन खंडोबा रोड परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे मिळाली होती.

त्यावरून पोलिसांच्या पथकाने सायंकाळी सहा वाजता काटवण खंडोबा रोडवरील गाझीनगर येथे दोन ब्रास वाळूसह टाटा कंपनीचा ट्रक (क्र. एमएच ०४, ईबी ७२६५) जप्त केल. या कारवाई ४लाख २० हदार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी रवींद्र घुंगासे यांच्या फिर्यादीवरून रवी बर्डे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार ढगे हे करीत आहेत.
- Union Bank Of India मध्ये 399 दिवसाच्या एफडी योजनेत अडीच लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- नवीन घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग ‘या’ टिप्स लक्षात ठेवा, लाखो रुपयांचा खर्च वाचणार, पहा…
- घरात साप शिरला तर घाबरू नका, फक्त ‘हे’ उपाय करून पहा, साप असा पळणार की परत मागे फिरणार पण नाही
- मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! पुढील आठवड्यात ‘या’ मार्गावर धावणार नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस, पुण्यालाही मिळणार नवीन रेल्वेगाडी
- सासू सासऱ्याच्या संपत्तीत जावयाला पण अधिकार मिळतो का ? उच्च न्यायालयाने दिलाय असा निकाल