मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली आहे. सध्याच्या १२२ आमदारांपैकी २५ जणांचा ‘पत्ता कट’ होण्याची शक्यता भाजप सूत्रांनी वर्तविली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष आणि संघाने संपूर्ण राज्यात ‘सर्व्हे’ केला आहे. त्या-त्या ठिकाणचे राजकारण, जनसंपर्काचा अभाव सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्याची टाळाटाळ आणि एकूणच कृतीशून्य व्यक्तिमत्त्व अशा पद्धतीच्या निकषांवर साधारण २५ आमदारांची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता आहे. त्यात नेमका कोणाचा नंबर लागणार, हे मात्र गुलदस्त्यात आहे.
विधानसभेच्या या निवडणुकीत प्रचंड विजय मिळविण्याचा प्रयत्न भाजप आणि शिवसेना ‘युती’कडून होणार आहे. सुरुवातीच्या काळात हे दोन्ही पक्ष ‘स्वबळा’वर लढतील असे राजकीय तज्ज्ञांना वाटत होते. पण, महायुती करूनच मोठा विजय मिळविण्याचे भाजपने नक्की केले आहे.
अशा परिस्थितीत महायुतीला महाराष्ट्रात २२९ जागा मिळतील असा ‘सर्व्हे’ सांगतो. प्रत्यक्षात यश कितपण मिळेल याचा शेवटी हा अंदाजच आहे. पण, अशा आकडेवारीवरून विरोधकांना खच्ची करण्याचा एकही प्रयत्न भाजप सोडणार नाही, असे सांगण्यात येते.
- 4 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ 2 कार आहेत मध्यमवर्गीयांची पहिली पसंत ; मायलेज अन फिचर्स कसे आहेत ? वाचा सविस्तर
- Rent Agreement: भाड्याच्या घरात राहायला जायचे असेल तर ‘या’ गोष्टींकडे काळजीपूर्वक द्या लक्ष! नाहीतर सापडाल अडचणीत
- Ahmednagar News : विधवेस मारहाण, महिलेचे घर जाळले ! अहमदनगरमध्ये ‘येथे’ स्थनिक गुंडाची दहशत
- TISS Mumbai Bharti 2024 : TISS मुंबई मध्ये निघाली 50 हजाराची नोकरी, बघा शैक्षणिक पात्रता काय आहे?
- घर- फ्लॅट खरेदी करण्यासाठी होम लोन घ्यायचे तर किती पगार असावी? ‘या’ सूत्रानुसार करा नियोजन नाहीतर हप्ते भरण्यातच जाईल आयुष्य