तब्बल १३ तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-शनिवारी सकाळी ६ वाजता बंद झालेला राहुरी शहरातील वीज पुरवठा तब्बल १३ तासांनी सुरळीत झाला.राहुरीच्या १३२ केव्हीमधील दुरुस्तीसाठी शनिवारी तब्बल १२ तास वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला.

मात्र, सकाळी ६ वाजता गुल झालेल्या महावितरणचा वीज पुरवठा सायंकाळी सहानंतर देखील तासभर बंदच राहिल्याने राहुरीतील लहान, मोठ्या व्यावसायिकांची चांगलीच निराशा झाली.

सायंकाळी ७ वाजता विजेचा पुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. राहुरीच्या १३२ केव्ही केंद्रातील दुरुस्तीसाठी राहुरीतील विजेचा पुरवठा शनिवारी १२ तास बंद ठेवण्यात आला होता. विजेचा पुरवठा बंद असल्याने निगडित असलेले व्यवसाय शनिवारी संपूर्ण दिवस बंद राहिले.

दुरुस्तीचे काम केव्हा पूर्ण होईल, अशी वीज ग्राहकांची विचारणा महावितरणच्या शहरातील कार्यालयाच्या भ्रमणध्वनीवर सायंकाळी ६ वाजेनंतर सुरू होती. मात्र, सांगता येणार नाही हे उत्तर नागरिकांना मिळाले. सायंकाळी ६ वाजेनंतरही विजेचा पुरवठा तासभर बंद राहिल्याने बाजारपेठेतील काही व्यावसायिकांनी दुकाने बंद करून घरचा रस्ता धरला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News