मोदी सरकारच्या पुतळ्याचे दहन पडले महागात, आंदोलकांविरोधात गुन्हा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देत श्रीरामपूर येथील छत्रपती संभाजी चौकात शनिवारी सायंकाळी आंदोलन झाले. केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करून मोदी सरकाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.

मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण गर्दी जमवून केंद्र सरकारच्या कृषी व कामगार कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारचा निषेध करून मोदी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केल्याप्रकरणी नागेश सामंत यांच्यासह सहा आंदोलकांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

यावेळी कामगार नेते नागेश सामंत, राजेंद्र भोसले, जलील शहा, भरत जाधव, विष्णू भागवत, जनार्दन भवर, भारती शिंदे, सिंधुबाई बनकर, ज्योती राठोड यांनी आंदोलनात सहभाग घेऊन केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला.

दिल्ली येथील आंदोलनातील शेतकऱ्यांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करून तहसीलदार प्रशांत पाटील यांना कामगार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी कामगार नेते नागेश सांमत यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी कामगार, हमाल-माथडी कामगार, महाबीज कामगार, सिमेंट कामगार संघटना, पेठ हमाल-माथडी कामगार, शेतमजूर, हातगाडी कामगार, रिक्षा कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe