कोपरगाव :- शेजारच्या सर्व तालुक्यांचा दुष्काळाच्या यादीत समावेश होतो. मात्र, कोपरगाव तालुक्यात दुष्काळजन्य स्थिती असूनही दुष्काळाच्या यादीतून तो वगळला गेला. आमदारांना तालुक्याची वास्तव स्थिती मांडता आली नाही.
अनेक तालुक्यांना दुष्काळाच्या अनुदानाचा लाभ मिळाला. मात्र, कोपरगावची जनता अनुदानापासून वंचित राहिली. हजारो क्युसेस पाणी जायकवाडीत वाहून गेले, पण गोदावरी कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मात्र विकतचे पाणी घ्यावे लागले.

आमदार उदासीन असल्यामुळे तालुका भकास झाल्याचे टीकास्त्र कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता सोडले.
सोनेवाडी, पोहेगाव, रांजणगाव देशमुख, देर्डे-चांदवड, देर्डे-कोऱ्हाळे येथील विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन काळे यांच्या हस्ते पार पडले. ते पुढे म्हणाले, मागील पाच वर्षांपासून गोदावरी कालव्याच्या आवर्तनांचा बट्ट्याबोळ झाला आहे.
२०१४ पर्यंत तालुक्यात होणारी कालवा सल्लागार समितीची बैठक आता मुंबईत होते. या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. आवर्तन दिले जात नाही, असे ते म्हणाले.
- पालकांनो! मुलांचे आधार वेळेवर अपडेट केलेत का? नाहीतर शैक्षणिक आणि सरकारी कामात येवू शकते अडचण
- अहिल्यानगर महानगरपालिकेकडे शिक्षकांचे ५ महिन्यांचे पगार रखडले! हप्ता थकला, सिबील झाला खराब, घर चालवण्यासाठी आली उसनवारीची वेळ
- निळवंडे धरणामुळे श्रीरामपूरच्या पाण्यावर येणार गदा? पाणी वाचवण्यासाठी आमदार ओगले उतरले मैदानात
- अहिल्यानगरमधील धर्मादाय रुग्णालयांनी जमा निधीपेक्षा दुप्पट खर्च केल्याचे उघड, तर अनेक रूग्णालयाकडून नियमांचे उल्लंघन
- महाराष्ट्रात तयार होणार आणखी एक नवा महामार्ग ! समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार नवा Expressway, कसा असणार रूट ? पहा….