श्रीगोंदे :- तालुक्याचे नेतृत्व पाच वर्षे चुकीच्या व्यक्तीकडे गेल्यामुळे पाणीप्रश्नावर तालुक्याचे वाटोळे झाले. सामान्य शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला.
ही चूक सुधारण्यासाठी पुन्हा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना तालुक्याचे लोकप्रतिनिधी करण्यासाठी संपूर्ण गावाने विजयासाठी एकोपा करून एल्गार पुकारला आहे. यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भगवानराव पाचपुते यांनी केले.

तालुक्यातील काष्टी येथील राजयोग मंगल कार्यालयात गुरुवारी सायंकाळी गावाची बैठक भगवानराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हा फेडरेशनचे उपाध्यक्ष अनिल पाचपुते,
जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते, नागवडे दूध संघाचे माजी अध्यक्ष माणिकराव पाचपुते, विठ्ठलराव काकडे, दिलीप चौधरी, बाळासाहेब राहिंज, शिवाजीराव पाचपुते, बंडू जगताप, डाॅ. बाळासाहेब पवार, बाजार समितीचे उपसभापती वैभव पाचपुते, रफिक इनामदार, ज्ञानदेव गवते आदी उपस्थित होते.
माजी मंत्री पाचपुते म्हणाले, विधानसभेचे तिकीट आपल्यालाच आहे. काही जण माझ्यावर आरोप करतात, पण त्यांची तेवढी उंची व पात्रता नाही, म्हणून टीका करून कोणाला मोठे करायचे नाही, अशी कोपरखळी पाचपुते यांनी आमदार राहुल जगताप यांचे नाव न घेता लगावली. आपले तालुक्यात तीनवेळा दौरे झाले. विरोधक कुठेच पोहोचले नाही, असेही पाचपुते म्हणाले.
- अनुसूचित जाती, नवबौद्ध बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टरवर ९०% अनुदान; फक्त ३५ हजारांत मिळणार ट्रॅक्टर
- मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर दुहेरी कोंडी; सीटीईटी परीक्षा की निवडणूक कर्तव्य?
- प्रायव्हेट जेट बुक करणं सामान्य माणसालाही शक्य? जाणून घ्या खर्च, प्रक्रिया आणि वास्तव
- आयुष्मान भारत योजना : ७० वर्षांवरील नागरिकांना कसा मिळतो १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ?
- वारकऱ्यांच्या सोयीसाठी भुसावळ-पंढरपूर नियमित रेल्वेची जोरदार मागणी; कायमस्वरूपी एक्स्प्रेस कधी सुरू होणार?













