श्रीगोंदे :- तालुक्याचे नेतृत्व पाच वर्षे चुकीच्या व्यक्तीकडे गेल्यामुळे पाणीप्रश्नावर तालुक्याचे वाटोळे झाले. सामान्य शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला.
ही चूक सुधारण्यासाठी पुन्हा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना तालुक्याचे लोकप्रतिनिधी करण्यासाठी संपूर्ण गावाने विजयासाठी एकोपा करून एल्गार पुकारला आहे. यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भगवानराव पाचपुते यांनी केले.

तालुक्यातील काष्टी येथील राजयोग मंगल कार्यालयात गुरुवारी सायंकाळी गावाची बैठक भगवानराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हा फेडरेशनचे उपाध्यक्ष अनिल पाचपुते,
जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते, नागवडे दूध संघाचे माजी अध्यक्ष माणिकराव पाचपुते, विठ्ठलराव काकडे, दिलीप चौधरी, बाळासाहेब राहिंज, शिवाजीराव पाचपुते, बंडू जगताप, डाॅ. बाळासाहेब पवार, बाजार समितीचे उपसभापती वैभव पाचपुते, रफिक इनामदार, ज्ञानदेव गवते आदी उपस्थित होते.
माजी मंत्री पाचपुते म्हणाले, विधानसभेचे तिकीट आपल्यालाच आहे. काही जण माझ्यावर आरोप करतात, पण त्यांची तेवढी उंची व पात्रता नाही, म्हणून टीका करून कोणाला मोठे करायचे नाही, अशी कोपरखळी पाचपुते यांनी आमदार राहुल जगताप यांचे नाव न घेता लगावली. आपले तालुक्यात तीनवेळा दौरे झाले. विरोधक कुठेच पोहोचले नाही, असेही पाचपुते म्हणाले.
- 7वा वेतन आयोगासारखं 8व्या आयोगात होणार नाही ! कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळणारच नाही ? सरकारच्या भूमिकेने कर्मचारी चिंतेत
- 2026 मध्ये चांदीची किंमत अडीच लाख रुपये प्रति किलो होणार ? तज्ञांचा अंदाज काय सांगतो
- महाराष्ट्रातील ‘हे’ दोन जिल्हे जोडणारा नवीन रेल्वेमार्ग तयार होणार ! नव्या प्रकल्पाचा 30 लाख नागरिकांना होणार फायदा
- पीएफ खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ तारखेपासून एटीएम आणि यूपीआयद्वारे पैसे काढता येणार, मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली अपडेट
- राज्यातील लाडक्या बहिणींसाठी चिंताजनक बातमी ! नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता लांबणीवर जाणार, कारण काय ?













