नवी दिल्ली : देशभरातील ५ हजार रेल्वे स्थानकांवर आतापर्यंत मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील मिदनापूर रेल्वे स्थानक हे ५ हजारावे स्थानक ठरल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
जानेवारी २०१६ साली मुंबई मध्य रेल्वे स्थानकापासून सुरू झालेल्या मोफत वायफायच्या प्रवासाने ५००० चा टप्पा पूर्ण केला आहे. ४४ महिन्यांमध्ये रेलटेलने यशस्वीरीत्या पाच हजार स्थानकांवर वायफाय सुविधा जोडली आहे. यामध्ये ७० टक्के स्थानके ही ग्रामीण भागातील आहेत, अशी माहिती रेल्वेने दिली.
तर थांबा वगळता देशभरातील संपूर्ण रेल्वे स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यापासून आम्ही काही पावले दूर असल्याचे रेलटेलचे प्रमुख पुनीत चावला म्हणाले. रेलटेलचे कर्मचारी, सहकारी आणि भारतीय रेल्वेच्या पाठिंब्यामुळे हे सर्व शक्य झाले. मोफत वायफाय सुविधा लोकांमध्ये अधिक लोकप्रिय होत चालली आहे.
- यंदाच्या लोकसभेत प्रमुख पक्षांकडून मुस्लिम बांधवांना डावलले ! एकही मुस्लीम उमेदवार नाही, पहा चित्र..
- Ahmednagar News : पाणीबाणी ! वीजपुरवठ्याचाही होतोय बट्ट्याबोळ, उन्हाच्या कडाक्यात पाणीपुरवठा विस्कळित
- मे महिन्यातील रखरखत्या उन्हात अनुभवायची असेल हिवाळ्यातील थंडी तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट! वाचा माहिती
- Ahmednagar Breaking : विवाहितेचा गळा आवळून खून, शरीरावर मारहाण इतकी की मेंदूतून रक्तस्राव
- Home Loan: तुम्हाला जर 25 हजार रुपये पगार असेल तर किती मिळेल होम लोन? वाचा होमलोनचे कॅल्क्युलेशन