नवी दिल्ली : देशभरातील ५ हजार रेल्वे स्थानकांवर आतापर्यंत मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील मिदनापूर रेल्वे स्थानक हे ५ हजारावे स्थानक ठरल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
जानेवारी २०१६ साली मुंबई मध्य रेल्वे स्थानकापासून सुरू झालेल्या मोफत वायफायच्या प्रवासाने ५००० चा टप्पा पूर्ण केला आहे. ४४ महिन्यांमध्ये रेलटेलने यशस्वीरीत्या पाच हजार स्थानकांवर वायफाय सुविधा जोडली आहे. यामध्ये ७० टक्के स्थानके ही ग्रामीण भागातील आहेत, अशी माहिती रेल्वेने दिली.

तर थांबा वगळता देशभरातील संपूर्ण रेल्वे स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यापासून आम्ही काही पावले दूर असल्याचे रेलटेलचे प्रमुख पुनीत चावला म्हणाले. रेलटेलचे कर्मचारी, सहकारी आणि भारतीय रेल्वेच्या पाठिंब्यामुळे हे सर्व शक्य झाले. मोफत वायफाय सुविधा लोकांमध्ये अधिक लोकप्रिय होत चालली आहे.
- भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांचा राहुरीत जनता दरबार, नागरिकांच्या समस्यांचा केला निपटारा
- अहिल्यानगरमधील तरूणांचा गाजियाबाद येथे झालेला मृत्यू संशयास्पद असल्याचा नातेवाईकांचा आरोप
- राहुरी तालुक्यातील मुळा नदीवरील बंधारा अन् पुल दुरूस्तीचे काम ललकरच लागणार मार्गी, काम जलसंपदा विभागकडे वर्ग
- मृत्यू म्हणजे जणू आनंदाचा उत्सव, लोक रंगीबेरंगी कपडे घालून पार्टी करतात! कोणत्या देशात पाळली जाते ही विचित्र परंपरा?
- 67 ट्रॅक आणि 44 प्लॅटफॉर्म…’हे’ आहे जगातील सर्वात रहस्यमय आणि मोठे रेल्वे स्टेशन! गिनीज रेकॉर्डमध्येही झालीय नोंद