नवी दिल्ली : देशभरातील ५ हजार रेल्वे स्थानकांवर आतापर्यंत मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील मिदनापूर रेल्वे स्थानक हे ५ हजारावे स्थानक ठरल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
जानेवारी २०१६ साली मुंबई मध्य रेल्वे स्थानकापासून सुरू झालेल्या मोफत वायफायच्या प्रवासाने ५००० चा टप्पा पूर्ण केला आहे. ४४ महिन्यांमध्ये रेलटेलने यशस्वीरीत्या पाच हजार स्थानकांवर वायफाय सुविधा जोडली आहे. यामध्ये ७० टक्के स्थानके ही ग्रामीण भागातील आहेत, अशी माहिती रेल्वेने दिली.

तर थांबा वगळता देशभरातील संपूर्ण रेल्वे स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यापासून आम्ही काही पावले दूर असल्याचे रेलटेलचे प्रमुख पुनीत चावला म्हणाले. रेलटेलचे कर्मचारी, सहकारी आणि भारतीय रेल्वेच्या पाठिंब्यामुळे हे सर्व शक्य झाले. मोफत वायफाय सुविधा लोकांमध्ये अधिक लोकप्रिय होत चालली आहे.
- लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी अपडेट ! 2100 नाही तर ‘या’ महिलांना मे महिन्याच्या हप्त्यासोबत मिळणार 3 हजार रुपये
- …अन्यथा आजपासून उपोषणाला बसणार, खासदार निलेश लंके यांचा अधिकाऱ्यांना इशारा!
- दिल्ली येथील काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या बैठकीस महाराष्ट्रातून बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती.
- बाल्कनी की टेरेस? AC चा काँम्प्रेसर नेमका कुठे ठेवायचा? स्फोट होण्यापासून नेमके कसे वाचायचे?
- SBI कडून 20 वर्षांसाठी 44 लाख रुपयांचे होम लोन घेतल्यास किती रुपयांचा EMI भरावा लागेल ?