मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद थांबण्याचं नावच घेत नाही. पुन्हा एकदा हा वाद चर्चेत आला आहे. कंगनाने अभिनेता हृतिक रोशनवर निशाणा साधला आहे. पुन्हा एकदा कंगनाने आपला राग व्यक्त करत एक वक्तव्य केलं आहे.
कंगना रानौत आपल्याकडून हृतिकवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही. आता कंगनाने असं काही वक्तव्य केलंय की, ते ऐकून हृतिक देखील शांत बसणार नाही. कंगना म्हणाली की, जर ती हृतिक रोशन असती तर गप्प बसली नसती.

बॉलिवूड लाइफने दिलेल्या माहितीनुसार, कंगना एका कार्यक्रमात गेली तेव्हा तिने हे वक्तव्य केलं आहे. कंगना रानौतला विचारलं की, जर तुला एक दिवसाचा हृतिक रोशन केलं तर तू काय करू इच्छिते.
उत्तर देताना कंगना म्हणाले, आमच्या दोघांमध्ये जे काही झालं. किंवा आम्ही दोघांनी एकमेकांसोबत जे काही केलं त्यानंतर मी हृतिक असती तर कंगनाला फोन केला असता. आणि म्हटलं असतं की, मी तुझ्यासोबत जे काही केलं त्यासाठी ‘सॉरी’.
- अनुसूचित जाती, नवबौद्ध बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टरवर ९०% अनुदान; फक्त ३५ हजारांत मिळणार ट्रॅक्टर
- मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर दुहेरी कोंडी; सीटीईटी परीक्षा की निवडणूक कर्तव्य?
- प्रायव्हेट जेट बुक करणं सामान्य माणसालाही शक्य? जाणून घ्या खर्च, प्रक्रिया आणि वास्तव
- आयुष्मान भारत योजना : ७० वर्षांवरील नागरिकांना कसा मिळतो १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ?
- वारकऱ्यांच्या सोयीसाठी भुसावळ-पंढरपूर नियमित रेल्वेची जोरदार मागणी; कायमस्वरूपी एक्स्प्रेस कधी सुरू होणार?













