पारनेर : शेतीमालाला ऊत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव मिळावा तसेच सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी दि. २ ऑक्टोबर रोज़ी गावागावांत होणाऱ्या धरणे आंदोलनात भूमिपुत्र शेतकरी संघटना सहभागी होणार असल्याचे संघटनेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी १ जून २०१७ ला ऐतिहासिक शेतकरी संप पुकारला होता. या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांंचे कर्ज सरसकट माफ करण्याची घोषणा केली.

राज्यभरातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रूपये कर्जमाफी दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, पण प्रत्यक्षात आज अखेर ८९ लाख शेतकऱ्यांपैकी केवळ ४४ लाख ४ हजार १४७ शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, निम्याहून अधिक शेतकरी पात्र असतानाही कर्ज माफीपासून वंचित आहेत.
लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला नाही, जाहीर केलेल्या ३४ हजार कोटींपैकी आजअखेर शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ १८ हजार ७६१ कोटी ५५ लाख रुपये जमा झाले आहेत. यामुळे लाखो शेतकऱ्यांना नव्या पीक हंगामासाठी नवे पीककर्ज मिळाले नाही.
शेतकऱ्यांना यामुळे प्रचंड मन: स्ताप आणि निराशाच सहन करावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर दि. २ ऑक्टोबर रोजी गावा-गावांत होणाऱ्या धरणे आंदोलनात भूमिपुत्र शेतकरी संघटना सक्रिय सहभागी होणार असून, ग्रामसभेत ठराव करून ते राज्यपालांना पाठविण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. या धरणे आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी केले आहे.
- MPSC Pashudhan Vikas Adhikari Jobs 2025: तुमचं अधिकारी होण्याचं स्वप्न साकार करा! MPSC द्वारे पशुधन विकास अधिकारी पदासाठी तब्बल २७९५ जागांची भरती सुरू
- कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली हे करणे सोपे नव्हते मात्र आपण ते करून दाखवले – माजीमंत्री बाळासाहेब थोरात
- शेवगाव- पाथर्डी मतदारसंघातील ८३ तलाव होणार गाळमुक्त – आ. मोनिका राजळे
- लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी ! 2100 रुपयांचा हफ्ता कधीच मिळणार नाही ? सरकारमधील मंत्र्यांच्या विधानाने चर्चा
- ऊस आणि चारा पिके करपली, मुळाच्या पात्रात तातडीने पाणी सोडा ! शेतकऱ्यांची मागणी