जयपूर : राजस्थान सरकारने महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर गुटखा व पान मसाल्याचे उत्पादन, साठवणूक व विक्रीवर निर्बंध घातल्याची माहिती बुधवारी आरोग्य मंत्रालयाने दिली. या निर्णयामुळे महाराष्ट्र व बिहार या दोन राज्यांनंतर राजस्थान हे गुटखा व पान मसाल्यावर बंदी घालणारे तिसरे राज्य ठरले असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
युवकांना नशेच्या आहारी जाण्यापासून रोखण्यासाठी हा ठोस निर्णय घेण्यात आला आहे.अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत ही बंदी घालण्यात आली आहे. बाजारात विक्री होणाऱ्या पदार्थांमध्ये मॅग्नेशियम कॉर्बोनेट, निकोटीन, तंबाखू व खनिज तेलाचा समावेश आहे का, याची पडताळणी करण्याची जबाबदारी ‘केंद्रीय सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा राजस्थान’द्वारे करण्यात येणार आहे.

अत्यंत निकृष्ट दर्जाच्या पदार्थांवर नियंत्रण मिळविण्यासाठी काळ्या बाजारात विक्री होणारा पान मसाला व गुटख्यावर निर्बंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. रघू शर्मा यांनी दिली.
- अनुसूचित जाती, नवबौद्ध बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टरवर ९०% अनुदान; फक्त ३५ हजारांत मिळणार ट्रॅक्टर
- मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर दुहेरी कोंडी; सीटीईटी परीक्षा की निवडणूक कर्तव्य?
- प्रायव्हेट जेट बुक करणं सामान्य माणसालाही शक्य? जाणून घ्या खर्च, प्रक्रिया आणि वास्तव
- आयुष्मान भारत योजना : ७० वर्षांवरील नागरिकांना कसा मिळतो १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ?
- वारकऱ्यांच्या सोयीसाठी भुसावळ-पंढरपूर नियमित रेल्वेची जोरदार मागणी; कायमस्वरूपी एक्स्प्रेस कधी सुरू होणार?













