लखनौ : उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात मुबलक पाऊस पडला आहे. हा मुबलक पाऊस पडण्यामागे योगी सरकारच्या काळात गोहत्येमध्ये झालेली घट कारणीभूत आहे. गोहत्येमध्ये घट झाली म्हणूनच कुठेही दुष्काळ जाणवला नाही आणि पाऊसही समाधानकारक पडला असल्याचा दावा उत्तरप्रदेशचे पशुसंवर्धन मंत्री जयप्रकाश निषाद यांनी केला आहे.
निषाद म्हणाले,जेव्हापासून उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार बनले आहे, तेव्हापासून राज्यातील सर्व अवैध कत्तलखाने बंद झाले, तसेच राज्यात गोहत्येचे प्रमाणही कमी झालेले आहे. याची फलनीती म्हणजे निसर्गाने भरपूर साथ दिली आणि प्रचंड पाऊस पडला, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशातील पशुसंवर्धन मंत्री जयप्रकाश निषाद यांनी केले आहे.
यावेळी त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजना आणि विभागाच्या कामगिरीची माहिती दिली. तसेच मत्स्यपालनासाठी मच्छीमारांना डोळ्यांसमोर ठेवून उचललेल्या पाऊलाची माहितीही निषाद यांनी यावेळी दिली.
- Ahmednagar Politics : निलेश लंकेंना ‘बाप’ प्रकरण नडणार? फडणवीस अन् आयोगाकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी, अडचणीत वाढ
- लोन ॲपवरून तुम्ही देखील झटपट कर्ज घेत आहात का? ‘ही’ काळजी घ्या,नाहीतर अडकाल फसवणुकीच्या सापळ्यात
- Ahmednagar Politics : होता प्रचाराचा भव्य कार्यक्रम पण कार्यकर्त्यांची दांडी ! लोकच न आल्याने कार्यक्रम रद्द करण्याची खा. लोखंडेंवर नामुष्की?
- नगर जिल्ह्यातील ‘हे’ शेतकरी बंधू घेतात आल्याचे विक्रमी उत्पादन! यावर्षी घेतले एकरी 30 टन उत्पादन, वाचा कसे करतात नियोजन?
- Ahmednagar Politics : पालकमंत्री विखेंसमोरच महायुतीच्या बैठकीत दोन गटांत राडा ! लोखंडेंना ओळखत नसल्याच्या वक्तव्यावरून सुरु झालेला वाद..