लखनौ : उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात मुबलक पाऊस पडला आहे. हा मुबलक पाऊस पडण्यामागे योगी सरकारच्या काळात गोहत्येमध्ये झालेली घट कारणीभूत आहे. गोहत्येमध्ये घट झाली म्हणूनच कुठेही दुष्काळ जाणवला नाही आणि पाऊसही समाधानकारक पडला असल्याचा दावा उत्तरप्रदेशचे पशुसंवर्धन मंत्री जयप्रकाश निषाद यांनी केला आहे.
निषाद म्हणाले,जेव्हापासून उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार बनले आहे, तेव्हापासून राज्यातील सर्व अवैध कत्तलखाने बंद झाले, तसेच राज्यात गोहत्येचे प्रमाणही कमी झालेले आहे. याची फलनीती म्हणजे निसर्गाने भरपूर साथ दिली आणि प्रचंड पाऊस पडला, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशातील पशुसंवर्धन मंत्री जयप्रकाश निषाद यांनी केले आहे.

यावेळी त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजना आणि विभागाच्या कामगिरीची माहिती दिली. तसेच मत्स्यपालनासाठी मच्छीमारांना डोळ्यांसमोर ठेवून उचललेल्या पाऊलाची माहितीही निषाद यांनी यावेळी दिली.
- अनुसूचित जाती, नवबौद्ध बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टरवर ९०% अनुदान; फक्त ३५ हजारांत मिळणार ट्रॅक्टर
- मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर दुहेरी कोंडी; सीटीईटी परीक्षा की निवडणूक कर्तव्य?
- प्रायव्हेट जेट बुक करणं सामान्य माणसालाही शक्य? जाणून घ्या खर्च, प्रक्रिया आणि वास्तव
- आयुष्मान भारत योजना : ७० वर्षांवरील नागरिकांना कसा मिळतो १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ?
- वारकऱ्यांच्या सोयीसाठी भुसावळ-पंढरपूर नियमित रेल्वेची जोरदार मागणी; कायमस्वरूपी एक्स्प्रेस कधी सुरू होणार?













