मुंबई: काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी काँग्रेस सोडण्याचे संकेत दिले आहेत. माझी आता पक्षाला गरज उरलेली नसल्याचे सांगताना या निवडणुकीत पक्षाचा प्रचार करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. पक्षाला रामराम करायची वेळ अद्याप आलेली नाही, असे मला वाटते आहे.
पण पक्षातील नेते ज्या प्रकारची वागणूक देत आहेत ते पाहता आता तो दिवसही फारसा दूर नसल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.. काँग्रेसमधील तिकीट वाटपावर निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईतून विधानसभेची उमेदवारी मिळण्यासाठी केवळ एकाच नावाची मी शिफारस केली होती. मात्र त्या नावाबाबतही पक्षनेतृत्वाने विचार केलेला नाही.

पक्षनेतृत्वाला आपण याबाबत आधीच सांगितले होते की, जर माझे म्हणणे विचारात घेतले गेले नाही तर मी निवडणुकीत पक्षाचा प्रचार करणार नाही. त्यामुळे आता मी पक्षाचा प्रचार करणार नसल्याचे निरुपम यांनी स्पष्ट केले आहे.
- प्रतीक्षा संपली ! महाराष्ट्रातील ‘हा’ महत्त्वाचा घाट मार्ग अखेर वाहतुकीसाठी सुरू, 40 मिनिटांचा प्रवास आता फक्त 15 मिनिटात
- नागरिकांनो सावधान! मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाची एंट्री, डॉक्टर म्हणतात…
- सिबिल स्कोअरमुळे बँक नाकारत आहेत शेतकऱ्यांचे पीक कर्ज, बँकेवर FIR दाखल करण्याच्या फडणवीसांच्या आदेशाला मात्र केराची टोपली
- तब्बल 30 वर्षानंतर तयार होणार शुभ योग ! ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार अद्भुत लाभ
- भंडारदऱ्यातील निकृष्ट रस्त्यांचा काजवा महोत्सवाला फटका, निकृष्ट रस्त्यामुळे पर्यटन आणि स्थानिक रोजगार धोक्यात