अकोले : गेली पाच वर्षे तालुक्यातील प्रश्नांसाठी मोर्चे काढले. रस्त्यावर उतरलो. विधीमंडळातही आवाज उठविला. काही प्रश्नांची तड लागली; पण काही अजुनही प्रलंबित आहेत. सत्तेच्या विरोधात राहून कामे होत नाहीत, हे लक्षात आल्यावर तालुक्यातील प्रलंबित प्रश्न आणि विकासाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठीच जनतेच्या आग्रहाखातर भाजपत प्रवेश केला असल्याचे माजी आमदार वैभवराव पिचड यांनी म्हटले आहे.
भाजप, शिवसेना, रा.स.प., रिपाइं या महायुतीच्या वतीने भाजपने वैभवराव पिचड यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काल गुरुवारी पिचड यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या सभेत पिचड बोलत होते.
आ. पिचड म्हणाले, राज्य बदलतयं, देश बदलतोय, आपणही बदलावे आणि विकासाच्या या उत्सवात सामील व्हावे, यासाठीच आपण भाजपत प्रवेश केल्याचा पुरुच्चार त्यांनी केला. अकोल्याच्या विकासासाठीच आपण पक्षांतर केले असल्याचे ते म्हणाले.
- विखे कुटूंबाने सत्तेचे केंद्रीकरण केले ! कृषीभुषण प्रभावती घोगरे यांचा आरोप
- अहमदनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजय संकल्प सभेची जय्यत तयारी !
- ये रे ये रे पावसा…! महाराष्ट्रात Mansoon 2024 चा पहिला पाऊस कोणत्या तारखेला पडणार ? पंजाबरावांनी मान्सूनच वेळापत्रकच दिल
- CHME Society Nashik Bharti 2024 : नाशिकमधील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीमध्ये विविध जागांसाठी सुरु आहे भरती, असा करा अर्ज…
- NRCG Pune Bharti 2024 : ICAR-NRCG पुणे येथे पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, वाचा…