राहुरी : काँग्रेस-राष्ट्रवादीला हद्दपार करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये बाराचे बारा आमदार युतीचेच निवडून येतील याबाबत कोणत्याही प्रकारची शंका नाही. आमदार शिवाजीराव कर्डिले हे मला लोकसभेत मिळालेल्या मताधिक्यपेक्षाही जास्त मतांनी निवडून येतील आणि आम्ही दोघे मिळून या मतदारसंघाचा आणखी कायापालट करू, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
येत्या दोन वर्षात भ्रष्टाचार करणाऱ्यांना जेलची हवा खावी लागेल, असे भाकीत देखील केले आहे.राहुरी-नगर-पाथर्डी मतदार संघातील विधानसभेसाठीचे भाजप-शिवसेना व महायुतीचे उमेदवार आ. कर्डिले यांनी आज प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासमवेत खा. डॉ. विखे पाटील, ज्येष्ठ नेते ॲड. सुभाष पाटील, विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे, कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, संचालक सुरसिंग पवार, विजयराव डौले, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
- ‘या’ तारखांना जन्मलेल्या लोकांना 2026 मध्ये मिळणार अफाट यश ! यात तुमची पण जन्मतारीख आहे का ?
- फोन हरवल्यानंतर पहिल्या 15 मिनिटात ‘ही’ 5 कामे अवश्य करा !
- अमेरिकेच्या भूमिकेमुळे सोन्याच्या किमतीला ब्रेक ! चांदीचा भाव कसा आहे ?
- रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! मुंबईवरून ‘या’ शहरासाठी सुरू झाली नवीन एक्सप्रेस ट्रेन, 12 स्टेशनंवर थांबा मंजूर
- सातबारा नावावर असला तरी जमीन विक्रीचा पूर्ण अधिकार मिळत नाही ! कायद्यातील महत्त्वाच्या बाबी जाणून घ्या













