अहमदनगर :- भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांची नगर शहर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार इच्छा होती. त्यासाठीची आवश्यक तयारीही त्यांनी केली होती. पक्षाचा ‘एबी’ फॉर्म आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला होता.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी तसेच खासदार डॉ. सुजय विखेंचे दूत नितीन कुंकूलोळ व भंडारी यांनी वाकळेंना भेटून अर्ज न भरण्याची सूचना केली आणि वाकळेंची इच्छा ‘थंडावली’. त्यानंतर ‘पक्षादेशानुसार निवडणुकीत काम करणार’, असेही त्यांनी बोलताना सांगितले.

नगरची शिवसेनेकडे असलेली जागा भाजपकडे घेऊन पक्षाकडून येथे उमेदवारी करण्याची मनीषा वाकळे यांच्यासह माजी खासदार दिलीप गांधी, त्यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी व माजी शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांची होती.
ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रा. बेरड यांनी घरी येऊन त्यांची भेट घेतली व नगरमधून पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरायचा नाही, असा पक्षश्रेष्ठींचा आदेश असल्याचे त्यांना सांगितले.
त्यानंतर काही वेळाने नगरचे नवे खासदार डॉ. सुजय विखे यांचे दूत म्हणून नितीन कुंकूलोळ व भंडारी यांनी वाकळेंची भेट घेतली व अर्ज भरू नका, असा डॉ. विखेंचा निरोप असल्याचे स्पष्ट केले. या दोन सूचनांनंतर वाकळेंनी अर्ज दाखल करण्याचा विचार सोडून दिला.
- नवीन घर बांधताना ‘हे’ वास्तु नियम पाळाच, विशेषत: प्रवेशद्वार या दिशेलाच असावे; देवी लक्ष्मी राहील प्रसन्न!
- तुमचा मूलांक 3 आहे का? मग सावध व्हा! ‘या’ एका सवयीमुळे होऊ शकतं प्रचंड मोठं नुकसान!
- देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हा’ वास्तु उपाय! घरात पैशांची टंचाई कधीच भासणार नाही!
- जगभरात मुस्लिमांची सर्वाधिक लोकसंख्या कुठे? भारत आणि पाकिस्तानचा क्रमांक पाहून विश्वास बसणार नाही!
- AC पेक्षाही जास्त गारवा मिळेल, तेही कूलरमधून; फक्त वापरा ‘या’ सोप्या आणि स्मार्ट टिप्स!