‘शहरातील एक जण २५ वर्षे आमदार होते तर दुसरे मागील पाच वर्षे होते, पण या दोघांनाही आमदारनिधी सोडता शहर विकासासाठी सरकारकडून भरीव निधी आणता आला नाही’, अशी टीका बहुजन समाज पक्षाचे उमेदवार श्रीपाद छिंदम यांनी केली.
‘या दोन्ही आजी-माजी आमदारांनी शहर सौंदर्य, शहर विकास, औद्योगिक विकास, बेरोजगारी यांच्या विकासाबाबत शहराचे विद्रुपीकरण केले आहे. विद्यमान आमदारांच्या घरात दोन आमदारकी असून त्यांच्या आमदारनिधीशिवाय अन्य निधी त्यांना आणता आला नाही’, असे स्पष्ट करून छिंदम म्हणाले, ‘मी भाजपचा उपमहापौर केवळ १ वर्षभर असताना मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करून १० कोटींचा विकास निधी आणला होता. यावरून आमदार झाल्यावर विकास निधी कसा आणायचा, हे दाखवून देईन’, हेही त्यांनी स्पष्ट केले.
- Ahmednagar News : …पाच दिवसांनंतर पोपट उघडेचा मृतदेह सापडला ! धरणातील गाळात रुतलेला पाय व हात पोहण्याच्या स्थितीत.., खेकडे मासे असूनही पाच दिवस मृतदेह शाबूत
- Health Tips: सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी तुम्ही देखील ‘हे’ पदार्थ खातात का? खात असाल तर होऊ शकते शरीराला नुकसान
- LIC policy : एलआयसीची ‘ही’ योजना करेल मालामाल, आजच करा गुंतवणूक…
- Best Affordable Cars : 5.50 लाख रुपयांच्या ‘या’ कारची चर्चा सर्वत्र, एप्रिल महिन्यात झाली सर्वाधिक विक्री!
- Ahmednagar News : अहमदनगरमध्ये चाललय काय? लिलाव नाहीत तरी मुबलक वाळू, शहरासह ग्रामीण भागात कामे जोरात सुरु, वाळूचोरीने लाखोंच्या महसुलावर पाणी