‘शहरातील एक जण २५ वर्षे आमदार होते तर दुसरे मागील पाच वर्षे होते, पण या दोघांनाही आमदारनिधी सोडता शहर विकासासाठी सरकारकडून भरीव निधी आणता आला नाही’, अशी टीका बहुजन समाज पक्षाचे उमेदवार श्रीपाद छिंदम यांनी केली.
‘या दोन्ही आजी-माजी आमदारांनी शहर सौंदर्य, शहर विकास, औद्योगिक विकास, बेरोजगारी यांच्या विकासाबाबत शहराचे विद्रुपीकरण केले आहे. विद्यमान आमदारांच्या घरात दोन आमदारकी असून त्यांच्या आमदारनिधीशिवाय अन्य निधी त्यांना आणता आला नाही’, असे स्पष्ट करून छिंदम म्हणाले, ‘मी भाजपचा उपमहापौर केवळ १ वर्षभर असताना मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करून १० कोटींचा विकास निधी आणला होता. यावरून आमदार झाल्यावर विकास निधी कसा आणायचा, हे दाखवून देईन’, हेही त्यांनी स्पष्ट केले.

- पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी वारीत येणं म्हणजे जगाच्या पाठीवरील एक अद्भूत सोहळा- जलसंपदामत्री राधाकृष्ण विखे पाटील
- आषाढी एकादशीच्या निमित्ताने नेवाश्यात ज्ञानोबा माऊली जयघोषाने परिसर दुमदुमला, पैसे खांबांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी
- कोपरगाव तालुक्यात आगामी निवडणुकीत काळे-कोल्हे सत्तासंघर्ष तीव्र होणार, शिवसेना ठरणार गेमचेंजर?
- सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण ! 7 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत ?
- साईभक्तांसाठी बांधण्यात आलेल्या ‘त्या’ दोन इमारतीसंदर्भात साई संस्थानचा पाठपुरावा सुरू, विखेंची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावणार