कोपरगाव मागील पाच वर्षांत नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुटले नाहीत. मतदारसंघाचा विकास फक्त फ्लेक्सवरच झालेला दिसत आहे. २००४ ला ३५ वर्षांची सत्ता उलथवून टाकून मतदारांनी इतिहास घडवला. यावेळीही त्याची पुनरावृत्ती होणार आहे, असे राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी कवाडे गट, शेकाप मित्रपक्षाच्या वतीने काळे यांनी शुक्रवारी आपला अर्ज दाखल केला. या वेळी ते बोलत होते. काळे म्हणाले, पाच वर्षांत तालुक्याची वाताहत झाली आहे. जनता आमदाराच्या कारभाराला कंटाळली आहे.

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार नंबर साठवण तलावाचे विस्तारीकरण होऊ नये व नवीन पाच नंबर साठवण तलाव होऊ नये यासाठी आमदारांनी आपली राजकीय ताकद पणाला लावून नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवले. तो रोष मतदान यंत्रातून व्यक्त होणार आहे.
- महिंद्रा कंपनी महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 1500 एकरावर उभारणार सर्वात मोठी कंपनी, 150000000000 रुपयांच्या महागुंतवणूकीची घोषणा
- ग्राहक Kia च्या ‘या’ SUV वर फिदा; विक्रीने गाठला लाखोंचा टप्पा
- रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून थेट दिल्लीसाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस
- मोठी बातमी ! EPFO कडून आता पीएफचे पैसे फक्त 8 दिवसांत Bank खात्यात; कधीपासून सुरु होणार नवीन सुविधा?
- घर खरेदीदारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय ! बिल्डर लोकांना चपराक













