कोपरगाव मागील पाच वर्षांत नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुटले नाहीत. मतदारसंघाचा विकास फक्त फ्लेक्सवरच झालेला दिसत आहे. २००४ ला ३५ वर्षांची सत्ता उलथवून टाकून मतदारांनी इतिहास घडवला. यावेळीही त्याची पुनरावृत्ती होणार आहे, असे राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी कवाडे गट, शेकाप मित्रपक्षाच्या वतीने काळे यांनी शुक्रवारी आपला अर्ज दाखल केला. या वेळी ते बोलत होते. काळे म्हणाले, पाच वर्षांत तालुक्याची वाताहत झाली आहे. जनता आमदाराच्या कारभाराला कंटाळली आहे.

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार नंबर साठवण तलावाचे विस्तारीकरण होऊ नये व नवीन पाच नंबर साठवण तलाव होऊ नये यासाठी आमदारांनी आपली राजकीय ताकद पणाला लावून नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवले. तो रोष मतदान यंत्रातून व्यक्त होणार आहे.
- रथयात्रेच्या काळात ‘या’ राशींना लाभतो भगवान जगन्नाथांचा विशेष आशीर्वाद, होतात मालामाल!
- बांगलादेशमध्ये राजकीय गोंधळ, टीम इंडियाच्या दौऱ्यावर सस्पेन्स; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक
- महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ 2 प्रलंबित मागण्या पावसाळी अधिवेशनात पूर्ण होणार ?
- तब्बल ताशी 1,670 किमी वेगाने फिरते पृथ्वी, तरीही आपण इतकं स्थिर कसं जगतो? आर्यभट्ट यांनी 5 व्या शतकातच दिलं होतं याचं उत्तर!
- मुकेश अंबानी कोणत्या राशीचे आहेत?, त्यांच्या यशामागे लपलंय राशीचं रहस्य! जाणून घ्या अंबानी कुटुंबाच्या राशी