राहुरी – शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे जास्त गेले, तर भाजप सरकार महागाई वाढवते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अशा चुकीच्या धोरणामुळेच देशात आर्थिक मंदी आली, असा घणाघाती आरोप माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी केला. राहुरीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी गाडगेबाबा व्यापारी संकुल रस्त्यावर आयोजित सभेत पाटील बोलत होते.
ते म्हणाले, मागील निवडणुकीत राहुरीत दोन स्थानिक उमेदवार लढल्याने पराभवाची वेळ आली. मतदारसंघाला नवी दिशा देण्यासाठी राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन ताकद लावा. नव्या चेहऱ्यांना राष्ट्रवादीने संधी दिली आहे. लोक विचाराला महत्त्व देतात. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी काम करावे. अमोल मिटकरी म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, बेरोजगारांना रोजगार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत नेमके काय केले. फडणवीस यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असताना हे चित्र मीडियात दाखवले जात नाही.

गोपीनाथ मुंडे असते, तर फडणवीस मुख्यमंत्री झाले नसते. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले भाड्याने देणारे हे सरकार आहे. भाजपत निष्ठेला किंमत नाही, हे एकनाथ खडसे यांच्यावरून स्पष्ट झाले आहे. एकीकडे अनेक गुन्हे दाखल असलेले उमेदवार, तर दुसरीकडे एकही गुन्हा दाखल नाही असे राष्ट्रवादीचे उमेदवार हे लक्षात घेऊन स्थानिक उमेदवार हवा की, पार्सल उमेदवार हवा हे ठरवा, असे आवाहन मिटकरी यांनी केले.
- कर्जत नगरपंचायतीचा वाद पुन्हा उच्च न्यायालयात, आमदार रोहित पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला तिसऱ्यांदा दिले आव्हान!
- ……तर महाराष्ट्रातील ‘या’ शाळांची मान्यता रद्द होणार ! शिक्षकांनाही बसणार फटका
- साईबाबांच्या शिर्डीत मोठी चोरी, ३ कोटी २६ लाखांचे साडेतीन किलो सोने आणि ४ लाखांची रोकड लंपास
- वंदे भारत एक्सप्रेसनंतर आता मुंबईला वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट मिळणार ! ‘या’ मार्गांवर धावणार
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! पुणे-दानापुर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनला राज्यातील ‘या’ स्थानकावर थांबा मंजूर करण्याची मागणी