अहमदनगर :- एकाच घरात दोन आमदारकी असतानाही शासनाचा निधी शहरात आणता आला नाही. या दोघांनीही शहर विकासाचे विद्रुपीकरण केल्याचा हल्लाबोल बसपाचा उमेदवार श्रीपाद छिंदम याने केला.
तो म्हणाला, शहरातील सेनेचे उमेदवार 25 वर्षे आमदार होते, दुसरे राष्ट्रावादीचे उमेदवार मागील पाच वर्षांपासून आमदार आहेत. पण या दोघांनाही आमदार निधी सोडता शहर विकासासाठी सरकारकडून भरीव निधी आणता आला नाही. त्यामुळे शहरास उतरती कळा लागली.

या दोन्ही आजी-माजी आमदारांनी शहर सौंदर्य, शहर विकास, औद्योगिक विकास, बेरोजगारी यांच्या विकासाबाबत शहराचे विद्रुपीकरण केले आहे. आमदार झाल्यानंतर विकास निधी कसा आणायचा, हे दाखवन देईन, छिंदम याने जगताप, राठोड यांचा नामोल्लेख टाळून टीकास्त्र सोडले.
- महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी ! बोर्ड परीक्षा आधी विद्यार्थ्यांना….
- पुणे रिंगरोड व तळेगाव–चाकण–शिक्रापूर महामार्गाच्या कामासाठी डेडलाइन जाहीर ! कधीपर्यंत पूर्ण होणार काम? वाचा….
- SBI ची FD योजना बनवणार मालामाल ! २ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळणार ८४ हजाराचे व्याज
- पहिली ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! पुढील आदेश निघेपर्यंत शाळा बंद राहणार, शिक्षण विभागाचा सर्वात मोठा निर्णय
- महाराष्ट्रातील सेवानिवृत्त शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ शाळांवर होणार पुन्हा नेमणूक, मिळणार २० हजार रुपये पगार













