मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. मुंबईत चार दिवसांसाठी सर्व प्रकारची दारुविक्री बंद राहणार असल्याची माहिती मुंबई शहरचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १९ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरपर्यंत सलग तीन दिवस तसेच २४ ऑक्टोबर रोजी एक दिवस अशा एकूण चार दिवसांसाठी मुंबई शहरात सर्व प्रकारच्या दारुविक्रीवर बंदी असेल त्यामुळे सर्व दारुची दुकाने बंद ठेवण्यात येतील.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत नुकतीच संपली असून आता अर्जांची छाननी सुरु आहे. उद्या ७ ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर एकदा उमेदवारी निश्चित झाली की दोन दिवसांत प्रचाराचे नारळ फुटतील आणि राज्यात प्रचाराला वेग येईल. दरम्यान, राज्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून २४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
- भारतात आढळतो किंग कोब्रापेक्षाही विषारी साप ! ‘या’ सापाच्या दंशाने व्यक्ती वाचली तरी पॅरालिसीस होऊ शकतो
- पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी !
- महाराष्ट्रातील ‘या’ शहरात विमानतळासारखे भव्य बसस्थानक ! 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर
- इंजिनिअर बनायचंय ? मग सिव्हिल, मेकॅनिकल सोडा ‘या’ ब्रांचमधून इंजिनिअरिंग करा, लाखो रुपयांच्या पगाराची नोकरीं मिळणार
- पुण्यातील दक्षिण आणि उत्तर भागाला जोडणारा नवा मार्ग तयार होणार ! ‘या’ भागात विकसित होणार 20 किलोमीटर लांबीचा बोगदा