मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. मुंबईत चार दिवसांसाठी सर्व प्रकारची दारुविक्री बंद राहणार असल्याची माहिती मुंबई शहरचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १९ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरपर्यंत सलग तीन दिवस तसेच २४ ऑक्टोबर रोजी एक दिवस अशा एकूण चार दिवसांसाठी मुंबई शहरात सर्व प्रकारच्या दारुविक्रीवर बंदी असेल त्यामुळे सर्व दारुची दुकाने बंद ठेवण्यात येतील.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत नुकतीच संपली असून आता अर्जांची छाननी सुरु आहे. उद्या ७ ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर एकदा उमेदवारी निश्चित झाली की दोन दिवसांत प्रचाराचे नारळ फुटतील आणि राज्यात प्रचाराला वेग येईल. दरम्यान, राज्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून २४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
- Satana Merchants Co-op Bank : नाशिकमधील सटाणा मर्चंट्स को-ऑप बँकेत निघाली मोठी भरती; वाचा सविस्तर बातमी…
- Ahmednagar Breaking : सख्खा मेहुणा व मावसभावांचा आठ वर्ष अत्याचार ! उन्हाळ्यात, दिवाळीत राहायला यायचे आणि.. फाशी देण्याचा विहिरीत ढकलण्याचाही प्रयत्न…
- EDLI Scheme : पीएफ खातेधारकांना मोफत मिळतो 7 लाख रुपयांचा विमा, कसा आणि कुठे दावा करावा? वाचा…
- Fixed Deposit : 5 वर्षांची FD तुम्हाला बनवेल मालामाल! ‘या’ बँका देतायेत बंपर व्याज, PPF सारख्या योजनांनाही सोडले मागे…
- Ahmednagar News : लाखोंचे श्रद्धास्थान अहमदनगरच्या हरिश्चंद्रगडावरील शिवपिंड दुभंगली ! दहाव्या शतकात झांज राजाने बांधलेय मंदिर..