मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. मुंबईत चार दिवसांसाठी सर्व प्रकारची दारुविक्री बंद राहणार असल्याची माहिती मुंबई शहरचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १९ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरपर्यंत सलग तीन दिवस तसेच २४ ऑक्टोबर रोजी एक दिवस अशा एकूण चार दिवसांसाठी मुंबई शहरात सर्व प्रकारच्या दारुविक्रीवर बंदी असेल त्यामुळे सर्व दारुची दुकाने बंद ठेवण्यात येतील.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत नुकतीच संपली असून आता अर्जांची छाननी सुरु आहे. उद्या ७ ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर एकदा उमेदवारी निश्चित झाली की दोन दिवसांत प्रचाराचे नारळ फुटतील आणि राज्यात प्रचाराला वेग येईल. दरम्यान, राज्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून २४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
- लाडक्या बहिणींना मिळाला मोठा दिलासा , आता या तारखेपर्यंत केवायसी पूर्ण करता येणार ! केवायसीच्या नियमात पण झाला बदल
- पीएम किसानच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ शेतकऱ्यांचे 2,000 रुपये कायमचे बंद होणार, कारण काय?
- लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी ! पुढचा हप्ता 1500 चा नाही तर 4500 चा मिळणार, वाचा डिटेल्स
- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! शहराला मिळणार दोन नवीन मेट्रो मार्ग, महाराष्ट्र राज्य शासनाची मान्यता
- आठव्या वेतन आयोगात घरभाडे भत्ता पण वाढणार का ? वाचा सविस्तर













