नवी दिल्ली : विजयादशमीच्या मुहूर्तानंतर महाराष्ट्र व हरयाणा विधानसभेच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात १० व हरयाणात ५ प्रचारसभा घेऊन प्रामुख्याने कलम ३७०, पारदर्शक प्रशासन, एनआरसी आदी राष्ट्रीय मुद्यांवर जोर देणार आहेत. भाजप अध्यक्ष अमित शाह हेसुद्धा या राज्यांत मोदींहून दुप्पट सभा घेऊन भाजपची सत्ता राखण्याचा प्रयत्न करणार आहेत.
महाराष्ट्र व हरयाणात २१ तारखेला विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे. सध्या भाजप केंद्र सरकारच्या निर्णयांना या दोन्ही राज्यांतून मिळणाऱ्या प्रतिसादाचा फिडबॅक घेत आहे. विशेषत: विरोधी पक्षांच्या नेत्यांवर करण्यात येणाऱ्या कारवाईिवषयी जनतेत काय वातावरण आहे? याची चाचपणी केली जात आहे. विरोधकांनी या कारवाईला ‘राजकीय सूडा’ची उपमा दिल्याने खास खबरदारी घेण्यात येत आहे.

पण, विरोधी बाकावरील अनेक नेत्यांनी ‘कलम ३७०’ सारख्या निर्णयांना पाठिंबा दिल्याने विरोधी पक्ष विशेषत: काँग्रेस ‘बचावात्मक’ भूमिकेत आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह या दोघांनाही उपरोक्त दोन्ही राज्यांतील भाजपची सत्ता कायम राहील, असा ठाम विश्वास आहे. ‘हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर व महाराष्ट्रातील त्यांचे समकक्ष देवेंद्र फडणवीस या दोघांनाही आपली प्रतिमा स्वच्छ ठेवून सरकार प्रामाणिक व सक्षमपणे चालवण्यात यश आले आहे.
- 18 मे – 10 जून 2025 दरम्यान बँकांना ‘इतके’ दिवस सुट्टी राहणार ! वाचा सविस्तर
- भारतात आढळतो किंग कोब्रापेक्षाही विषारी साप ! ‘या’ सापाच्या दंशाने व्यक्ती वाचली तरी पॅरालिसीस होऊ शकतो
- पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी !
- महाराष्ट्रातील ‘या’ शहरात विमानतळासारखे भव्य बसस्थानक ! 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर
- इंजिनिअर बनायचंय ? मग सिव्हिल, मेकॅनिकल सोडा ‘या’ ब्रांचमधून इंजिनिअरिंग करा, लाखो रुपयांच्या पगाराची नोकरीं मिळणार