श्रीगोंदे :- कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याची माहिती काढायची, कोर्टात याचिका दाखल करायची आणि स्वार्थासाठी आर्थिक तडजोड करुन नेतेगिरी करणाऱ्याला कायमचे घरी बसवा, असे आवाहन तेली समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत यांनी मंगळवारी केले.
काष्टी येथे भाजपचे बबनराव पाचपुते यांच्या प्रचारासाठी भगवानराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. विठ्ठलराव काकडे, सदाशिव पाचपुते, विजय भोईटे, बापूसाहेब हिरडे, काका रोडे, गणपतराव परकाळे, कुंडलिकराव भोसले, विठ्ठल गुंड, सुनील मगर, शांतिलाल खरात, आबासाहेब कोल्हटकर, सर्जेराव रंधवे, दत्तात्रय गायकवाड, नेमचंद बाबर, सुदाम पवार यावेळी उपस्थित होते.

भगवानराव पाचपुते म्हणाले, खरा विकास करणारा माणूस कोण आहे याचा विचार करा. पाच वर्षे सत्ता देऊन शेतीचे वाटोळे करणाऱ्याला नियतीने घरी बसवले. सत्तेवर असताना पाण्याचे नियोजन करता आले नाही.
साखर कारखाने बंद ठेवण्याची वेळ कोणामुळे आली, याचा मतदारांनी विचार करावा. निवडणूक आली की, आर्थिक तडजोडी करुन राजकारण करणाऱ्यांची दुकानदारी बंद करा, असे म्हणत त्यांनी घनश्याम शेलार व आमदार जगताप यांचा चांगलाच समाचार घेतला.
- एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज ! Nashik ते पुणे प्रवास होणार सुपरफास्ट, नाशिकवरून महाराष्ट्रातील ‘या’ शहरांसाठी दर 15 मिनिटांनी धावणार बस
- सोन्याच्या किंमतीत पुन्हा मोठा बदल, 28 एप्रिल 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव कसा राहिला ? महाराष्ट्रात काय आहे स्थिती ? वाचा….
- 38 वर्षांपूर्वी Royal Enfield Bullet 350 ची किंमत किती होती ? 1986 मधील बुलेटचे बिल पाहून तुम्हीही चकित व्हाल, पहा….
- वाईट काळ आता संपणार ! 28 एप्रिल 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरु होणार, प्रत्येकच कामात मिळणार जबरदस्त यश
- Ahilyanagar Gold Price : अक्षय्यतृतीयेला सोने खरेदी करा, सोन्याचे भाव वाढणार! गुंतवणुकीसाठी हीच सुवर्णसंधी….