बीड : वंचित, ओबीसी बांधवांना मोदी सरकारच्या काळात संवैधानिक दर्जा मिळाला. त्यामुळे हा घटक विकासाच्या मुख्य प्रवाहात आला आहे. ७० वर्षांत जे पक्ष सत्तेत होते, त्यांनी विकास का केला नाही? असा सवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केला.
संत भगवान बाबा व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोड मजुरांच्या कल्याणाचा सतत विचार केला. भाजप सरकार त्यांच्याच विचारांवर कारभार करत असल्याचे सांगून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग त्यांनी फुंकले.
संत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट (ता.पाटोदा) येथे मंगळवारी (दि.८) दसरा मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यास अमित शहा यांनी संबोधित केले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भूपेंद्र यादव, विजय पुराणिक, पालकमंत्री पंकजा मुंडे, मंत्री जयदत्त क्षीरसागर, महादेव जानकर, राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, ओमराजे निंबाळकर, सुजय विखे पाटील यांच्यासह बीड व अहमदगनर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
- आमदार व खासदारांना किती मिळतो पगार व भत्ते? आमदार व खासदारांच्या कार्यक्षेत्रात किती येतात गावे? वाचा माहिती
- Ahmednagar News : मोदी, योगी यांच्या कणखर भूमिकेमुळेच हिंदू धर्माचे रक्षण, राष्ट्रहितासाठी मतदान करा ! हिंदुत्वादी कीर्तनकार संग्राम भंडारे यांचे नगरमधून मोठे आवाहन..
- Deolali Co-Operative Bank Bharti : नाशिक मधील ‘या’ बँकेत सुरु आहे भरती, अर्ज करण्यापूर्वी वाचा बातमी…
- Ahmednagar News : …पाच दिवसांनंतर पोपट उघडेचा मृतदेह सापडला ! धरणातील गाळात रुतलेला पाय व हात पोहण्याच्या स्थितीत.., खेकडे मासे असूनही पाच दिवस मृतदेह शाबूत
- Health Tips: सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी तुम्ही देखील ‘हे’ पदार्थ खातात का? खात असाल तर होऊ शकते शरीराला नुकसान