मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडीकडून अनेक तरुण मैदानात उतरले आहेत. या युवा नेत्यांना जनतेकडून काय प्रतिसाद मिळणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र, राज्याच्या राजकारणात अनुभवी नेत्यांसोबतच युवा नेत्यांची गरज आहे.
अशावेळी अनेक युवा नेते आपले नशिब आजमावत आहेत. आजची युवा नेते तंत्रस्नेही असल्याने त्यांचा वावर सोशल मीडियात पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांची युवा वर्गात मोठी चर्चा होताना दिसते. त्याचमुळे अनेक ठिकाणी ज्येष्ठांची मक्तेदारी मोडीत काढत तरुणतुर्क नेत्यांनी विधानसभेच्या रणांगणात आपला शड्डू ठोकला आहे.

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे रोहित पवार, काँग्रेसचे धीरज देशमुख, कोल्हापूरमधील काँग्रेसचे ऋतूराज पाटील, सांगोल्यातील डॉ. अनिकेत देशमुख, श्रीवर्धनमधून आदिती तटकरे, बीडमधून संदीप क्षीरसागर, मुक्ताईनगरमधून रोहिनी खडसे, भाजपचे राम सातपुते आदी युवा मंडळी पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत.
- कोपरगावच्या रखडलेल्या विकासकामांवरून राष्ट्रवादीमध्येच अंतर्गत घमासान!
- कोपरगावमध्ये बिबट्याची जोडी उघडपणे फिरतेय ! वनविभागाला झोप उडवणारा इशारा!
- महाराष्ट्रातील तिरुपती बालाजीच्या भक्तांसाठी खुशखबर! 6 जुलैपासून ‘ह्या’ शहरातून चालवली जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कस असणार वेळापत्रक ?
- Ahilyanagar Police : एलसीबी प्रवेशासाठी सुरु आहेत राजकीय भेटीगाठी ! जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष
- महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगात किती पगार वाढ मिळणार ? पे स्केल नुसार संभाव्य पगार वाढ जाणून घ्या