कर्जत: शेती दळणवळणासाठी चांगले रस्ते होणे गरजेचे आहेत. आरोग्य सुविधा, गुणवत्तापुर्ण शिक्षण या सर्व मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे.
मी पळुन जाणाऱ्यांमधला नसून फक्त फ्लेक्सवर विकास न करता प्रत्यक्षात करून दाखवणार असल्याचे मत राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी व्यक्त केले. कर्जत तालुक्यातील भांबोरा येथे गावभेट दौऱ्यात ते बोलत होते.

तालुक्यातील जलालपुर, सिद्धटेक, दूधोडी, भांबोरा, राशीन, तरडगाव, निमगाव डाकु, दिघी, चापडगाव आदी ठिकाणी गावभेट दौरे करत रोहित पवार यांनी तेथील प्रश्न जाणून घेतले. या दौऱ्यात शेती, रस्ते, पाणी या प्रश्नावर ग्रामस्थांकडून लक्ष वेधले जात आहे.
तालुक्याच्या विविध भागातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न पुढील काळात केला जाणार असल्याचे पवार म्हणाले. राशीन येथील जगदंबा देवीच्या पालखीचे दर्शन घेत पवार पालखी मिरवणुकीत सहभागी झाले.
- अरे बापरे! भारताची लोकसंख्या पोहोचली १४६ कोटींवर, चीनला टाकलं मागे; मात्र मुलं जन्माला घालण्याचा दर झाला कमी
- फक्त दोन दिवसात 65 पट सबस्क्राईब झालेला IPO… जाणून घ्या काय आहे खास?
- पृथ्वीचा विनाश सुरू? भारतात स्थिती गंभीर! हवामान बदलामुळे देशात 3.2 कोटी लोक बेघर, पुढील काळात…
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पेन्शन धारकांची पेन्शन किती वाढणार ? वाचा..
- अहिल्यानगर जिल्ह्यातील नऊ पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांच्या एसपी सोमनाथ घार्गे यांनी केल्या बदल्या