श्रीगोंदा : पाच वर्षे पोराच्या हातात सत्ता देवून शेतकऱ्यांच्या प्रपंचाचे वाटोळे केले. एकही काम शेतकरी हिताचे झाले नाही. खोटे बोलून शेतकऱ्यांचा बळी दिला आणि अपयश आले म्हणून निवडणूकीतून माघार घेऊन शेलारांना उभे केले.
तालुक्यात जगताप शेलार नटसम्राट व वगसम्राट जोडी तयार झाली आहे. त्याच्या भूलथापांना बळी पडू नका असे जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते यांनी बोलताना केले. श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे मा.मंत्री बबनराव पाचपुते यांच्या प्रचारार्थ सेवा संस्थेचे अध्यक्ष दिपक नादंगुडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.

यावेळी सभेला प्रा.तुकाराम दरेकर, रमेश गिरमकर, नानासाहेब झिटे, विठ्ठलराव काकडे, रंगनाथ बिबे,बशिर काझी,गणेश झिटे,महेश खेडकर, दादा शिर्के, विनोद मखरे, अहमदभाई पिरजादे, मच्छिद्र घोधडे, शहाजी खेडकर, दादा गोरे,
मुन्ना ढवळे,कालिदास ननवरे यांच्या सह मान्यवर हजर होते यावेळी बोलताना ॲड. सुभाष डांगे म्हणाले आमच्या गावच्या पोपटांनी एसटी महामंडाचे संचालक झाल्यानंतर तालुक्यात चालक वाहक म्हणून नोकरी अमिश दाखवून साडेतीनशे तरुणांना गंडा घालुन लाखो रुपये कमविले.
जो माणूस गावात ग्रामपंचायतीला निवडून आला नाही,असे डांगे म्हणाले. प्रास्तविक माजी सरपंच रोहिदास पवार यांनी करुण अहमद पिरजादे यांनी आभार मानले.
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ मार्केटमध्ये सोयाबीनला मिळाला 8,430 रुपये प्रति क्विंटलचा भाव, पिवळं सोन तेजीत
- वाईट काळ पण निघून जाणार….; 28 नोव्हेंबर पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश !
- RBI चा महाराष्ट्रातील ‘या’ बँकेला मोठा दणका! खातेधारकांना आता खात्यातून फक्त 5 हजार रुपये काढता येणार, वाचा डिटेल्स
- सोलापूरकरांसाठी गुड न्यूज ! जिल्ह्याला मिळणार आणखी एक वंदे भारत ट्रेन, कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर होणार?
- शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! आता 10 वी बोर्ड परीक्षेत ‘या’ विषयाला 25 गुण मिळाले तरी विद्यार्थी पास होणार