तिसगाव : शेतकऱ्यांचा आम्ही आदर करतो. चेक पाठवणारा या योजनेचा लाभार्थी होता का? त्याच्या खात्यात पैसे जमा झालेच नाहीत. मी भाषण कर्जत-जामखेडला केले. मात्र, चेक संगमनेरचा माणूस देतो. माझ्या बोलण्याचा विपर्यास करून मला बदनाम करण्यात आले, असा आरोप खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला.
विखे म्हणाले, आम्ही केलेल्या कामाची मते मागत असून विरोधक खोटेनाटे आरोप करत आहेत. आजची दुष्काळी परिस्थिती आपण पहात असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणण्याचे पाप राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. शेतकऱ्यांवर गोळीबार केला, धरणाबद्दलची अश्लिल भाषा वापरली, त्यावेळेस डोळे पाणवले का नाही.

सिंचन घोटाळा, बँक घोटाळा करून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना जेलमध्ये जावेच लागेल. राहुरी तालुक्यातील नावारूपाला आलेल्या अनेक संस्था तनपुरेंनी बंद पाडल्याने ते काय मतदारसंघाचा विकास करणार. तिसगावला पाणीटंचाई आहे. त्यावर तत्काळ उपाययोजना केल्या जातील.
- महाराष्ट्र राज्य शासनाचा डोळे दिपवणारा मेगाप्रोजेक्ट ! राज्यात तयार होणार नवा सहापदरी मार्ग, 5 तासांचा प्रवास फक्त दीड तासात
- नवीन वर्षाआधीच महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मिळाली मोठी भेट ! ‘या’ शहरातील दोन महत्त्वाची रेल्वे स्थानके प्रवाशांच्या सेवेत दाखल
- आठव्या वेतन आयोगात पेन्शन धारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार नाही का? सरकारने स्पष्टचं सांगितलं
- फडणवीस सरकारचा लाडकी बहिण योजनेबाबत आणखी एक मास्टरस्ट्रोक ! महायुती सरकारचा नवा निर्णय पहा…
- मोठी बातमी ! पुण्यातील ‘हा’ भाग सुद्धा आता मेट्रोच्या नकाशावर येणार, CM फडणवीसांची मोठी घोषणा













