तिसगाव : शेतकऱ्यांचा आम्ही आदर करतो. चेक पाठवणारा या योजनेचा लाभार्थी होता का? त्याच्या खात्यात पैसे जमा झालेच नाहीत. मी भाषण कर्जत-जामखेडला केले. मात्र, चेक संगमनेरचा माणूस देतो. माझ्या बोलण्याचा विपर्यास करून मला बदनाम करण्यात आले, असा आरोप खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला.
विखे म्हणाले, आम्ही केलेल्या कामाची मते मागत असून विरोधक खोटेनाटे आरोप करत आहेत. आजची दुष्काळी परिस्थिती आपण पहात असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणण्याचे पाप राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. शेतकऱ्यांवर गोळीबार केला, धरणाबद्दलची अश्लिल भाषा वापरली, त्यावेळेस डोळे पाणवले का नाही.

सिंचन घोटाळा, बँक घोटाळा करून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना जेलमध्ये जावेच लागेल. राहुरी तालुक्यातील नावारूपाला आलेल्या अनेक संस्था तनपुरेंनी बंद पाडल्याने ते काय मतदारसंघाचा विकास करणार. तिसगावला पाणीटंचाई आहे. त्यावर तत्काळ उपाययोजना केल्या जातील.
- मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर दुहेरी कोंडी; सीटीईटी परीक्षा की निवडणूक कर्तव्य?
- प्रायव्हेट जेट बुक करणं सामान्य माणसालाही शक्य? जाणून घ्या खर्च, प्रक्रिया आणि वास्तव
- आयुष्मान भारत योजना : ७० वर्षांवरील नागरिकांना कसा मिळतो १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ?
- वारकऱ्यांच्या सोयीसाठी भुसावळ-पंढरपूर नियमित रेल्वेची जोरदार मागणी; कायमस्वरूपी एक्स्प्रेस कधी सुरू होणार?
- अचानक श्रीमंतीची संधी? या ग्रीन एनर्जी स्टॉकमध्ये उसळी, मार्केटमध्ये खळबळ













