कोपरगाव : अटी आणि नियम यांच्याखाली ७० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून बाजूला ठेवले. राज्यातील सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. एका ठिकाणी तर भाजपच्या शेतकरी कार्यकर्त्याने मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या दिवशीच आत्महत्या करून तुमचे स्वागत करतो, अशी चिठ्ठी लिहून ठेवली. असे होत असेल तर ही सत्ता, राज्य कशासाठी आणि कुणासाठी? असा उद्विग्न सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक काळे हे होते. याप्रसंगी उमेदवार आशुतोष काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संदीप वर्पे, संजीव भोर, पद्माकांत कुदळे, चैताली काळे, स्नेहल शिंदे, संभाजी काळे, सुनील गंगुले आदी यावेळी उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, डॉ. अजय गर्जे व संतोष डागा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

शरद पवार म्हणाले, सामान्य माणसांच्या हाताला रोजगार देणाऱ्या संस्था सरकारने बंद पाडल्या, ही बाब भूषणावह नाही. मात्र, सत्तेचा गैरवापर करून ईडीचे खटले दाखल करणाऱ्या या भाजपच्या सत्तेला त्यांची जागा दाखवून देऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
कलम ३७० आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीचा संबंध काय, हे कलम या अगोदरही घटनेत होतं, ते फक्त बाजूला काढण्यात आलं.त्याला आमचा विरोध नाही, मग आठ राज्यात ३७१ का लावले नाही, अशी विचारणा करत या कलमाच्या आधारे राज्यातील व केंद्रातील सरकार राजकारण करीत असल्याचा आरोप करून ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले गडकिल्ले, स्वाभिमान व शौर्याचा इतिहास आहे. हा इतिहास पुसून टाकण्याचे काम राज्य सरकार करीत असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे सरकार करू शकले नाहीत. इंदू मिलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारकही त्यांना करता आले नाही, अशी टीकाही केली.
- महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार वार्षिक साडेसात हजार रुपये
- गुड न्यूज ! आजपासून सुरु होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, तिरुपतीला जाणे होणार सोपे, राज्यातील ‘या’ आठ रेल्वे स्टेशनवर घेणार थांबा
- 500000 रुपयांच्या गुंतवणूकीत सुरू होणारे टॉप 5 बिजनेस ! पहिल्या दिवसापासून होणार बंपर कमाई
- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ तारखेनंतरच मिळणार पीएम किसानचा लाभ
- दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! परीक्षेआधी बोर्डाने घेतला मोठा निर्णय ! आता प्रत्येक केंद्रावर…….













