इस्लामपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घड्याळाचे काटे बंद पडले आहेत. त्यांचे आता काही काम उरलेले नाही, असे राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी गद्दारांना महायुतीत थारा न देण्याचा निर्धार व्यक्त केला.
राज्याच्या भल्यासाठी महायुतीची घोषणा केली. पण उमेदवारी मिळाली नाही, म्हणून महायुतीची साथ सोडणाऱ्या बांडगुळांना पुन्हा महायुतीत प्रवेश देणार नाही.

यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट करत, उध्दव ठाकरेंनी येथील यल्लमा चौकात महायुतीने सत्तेत आल्यानंतर कामे केली म्हणूनच धनगर, मुस्लिम समाज युतीसोबत असल्याचा दावा केला.
अस्थिर सरकारला शिवसेनेने स्थिर केले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रान उठवले. याउलट काँग्रेस-राष्ट्रवादीने तुंबड्या भरायचे काम केले, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
- आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि 68 लाख पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची बातमी !
- Explained : पाथर्डीत पुन्हा रंगणार राजळे Vs ढाकणे युद्ध ! काय होणार निवडणुकीत ?
- RBI चा मोठा दणका ! देशातील ‘या’ मोठ्या बँकेचे लायसन्स रद्द, ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण
- पहिल्या वेतन आयोगापासून ते सातव्या वेतन आयोगापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढला ? वाचा सविस्तर
- IHMCL Jobs 2025: इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड अंतर्गत इंजिनिअर पदाची भरती सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती..