जयपूर : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवाडी ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री चहा प्यायल्यानंतर काही महिलांसह १४ जण बेशुध्द पडले. या लोकांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती अलवरचे मुख्य चिकित्सक व आरोग्य अधिकारी डॉ. ओमप्रकाश मीणा यांनी मंगळवारी दिली.
बाबा मोहनदास यांच्या यात्रेत आलेल्या १५ भाविकांनी एका स्टॉलवर चहा पिला होता. त्यानंतर आपल्याला बेशुध्दी जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्वांना भिवाडीच्या सामूहिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

त्यापैकी आठ जणांना बाहेर पाठवण्यात आले आहे. या भाविकांनी अफूमिश्रित चहा प्यायल्याने ते बेशुध्द पडले असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास केला जात असून चहाचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.
यात्रेत राजस्थानशिवाय हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह अन्य राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक येत असतात.
- प्रतीक्षा संपली ! महाराष्ट्रातील ‘हा’ महत्त्वाचा घाट मार्ग अखेर वाहतुकीसाठी सुरू, 40 मिनिटांचा प्रवास आता फक्त 15 मिनिटात
- नागरिकांनो सावधान! मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाची एंट्री, डॉक्टर म्हणतात…
- सिबिल स्कोअरमुळे बँक नाकारत आहेत शेतकऱ्यांचे पीक कर्ज, बँकेवर FIR दाखल करण्याच्या फडणवीसांच्या आदेशाला मात्र केराची टोपली
- तब्बल 30 वर्षानंतर तयार होणार शुभ योग ! ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार अद्भुत लाभ
- भंडारदऱ्यातील निकृष्ट रस्त्यांचा काजवा महोत्सवाला फटका, निकृष्ट रस्त्यामुळे पर्यटन आणि स्थानिक रोजगार धोक्यात