जयपूर : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवाडी ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री चहा प्यायल्यानंतर काही महिलांसह १४ जण बेशुध्द पडले. या लोकांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती अलवरचे मुख्य चिकित्सक व आरोग्य अधिकारी डॉ. ओमप्रकाश मीणा यांनी मंगळवारी दिली.
बाबा मोहनदास यांच्या यात्रेत आलेल्या १५ भाविकांनी एका स्टॉलवर चहा पिला होता. त्यानंतर आपल्याला बेशुध्दी जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्वांना भिवाडीच्या सामूहिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

त्यापैकी आठ जणांना बाहेर पाठवण्यात आले आहे. या भाविकांनी अफूमिश्रित चहा प्यायल्याने ते बेशुध्द पडले असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास केला जात असून चहाचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.
यात्रेत राजस्थानशिवाय हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह अन्य राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक येत असतात.
- मटणासारखा स्वाद, पण 100% व्हेज! कॅन्सरच्या रुग्णांसाठी वरदान आहे ‘हा’ पदार्थ, तब्बल 400 रुपये किलोने होते विक्री
- पूर्वीच्या काळात पत्रव्यवहारांसाठी कबुतरांचाच वापर का केला जाई?, कबुतराच्या नैसर्गिक GPSचं रहस्य उघड!
- गुजरातएवढा बर्फाचा तुकडा फुटण्याच्या मार्गावर?, मुंबईसह जगभरातील शहरांना जलप्रलयाचा धोका! वैज्ञानिकांचा खळबळजनक इशारा
- ‘या’ 5 राशींवर असते श्री गणेशाची विशेष कृपा, मिळते अपार संपत्ती आणि यश!
- महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ‘इतक्या’ वर्षांनी वाढणार ? समोर आली मोठी अपडेट