चंद्रपूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे देशभक्त होते. त्यांच्या देशभक्तीवर शंका नाही. मात्र, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसने त्यांच्यावर सतत अन्याय केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी मंगळवारी चंद्रपुरात पत्रकारांशी बोलताना केला.
सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी पुढे आली तर काँग्रेसचे नेते अस्वस्थ व्हायला लागतात. यामागील कारण अद्याप कळालेले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी दोनदा शिक्षा भोगणारे सावरकर हे एकमेव नेते होते.

मात्र, काँग्रेसने त्यांच्यावर सतत अन्याय केला. आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोपरांत न्याय मिळेल, असे शाहनवाज हुसेन यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर तेथील शांतता भंग होऊ नये म्हणून माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
- पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी ! पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या बाबत समोर आली मोठी अपडेट
- श्रीरामपुरात पिण्याच्या पाण्याला येतोय जनावर मेल्याचा वास, पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा संताप
- नेवासा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग, गडाख गटासमोर आमदार लंघेची प्रतिष्ठा पणाला
- शनि शिंगणापूर सौरऊर्जेने उजळणार, दिल्लीतील शनि भक्ताने दिले ८० लाख रूपयांचे भव्य दान
- संगमनेरमध्ये सव्वादोन कोटींच्या विकासकामांच्या निधीवरून राजकारण तापले, काँग्रेसचा आमदार खताळांवर जोरदार पलटवार