श्रीरामपूर :- विधानसभा मतदारसंघात घडलेल्या वेगवान घडामोडींमुळे शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी बाजी मारली असून त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने लहू कानडे यांना उमेदवारी दिल्याने तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना कांबळे यांचे काम करण्याचा आदेश दिल्यामुळे शिवसेना-भाजपा युतीमध्ये चैतन्य निर्माण झाले असून स्थानिक उमेदवार म्हणून भाऊसाहेब कांबळे यांचे पारडे जड मानले जात आहे.
दुसरीकडे करण ससाणे यांच्या गटाची धरावे की सोडावे अशी अवस्था झाल्याने ससाणे गटाची यंत्रणा कुणाला मदत करणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

गेल्या आठवड्यात ससाणे गट व भाऊसाहेब कांबळे यांच्या विरोधातील लोकांनी राधाकृष्ण विखे यांच्याशी संपर्क साधून अपक्ष उमेदवार उभा करण्याची योजना आखली होती. तशी तयारीही पूर्ण झाली होती.
याबाबत आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनाप्रमुखांचे लक्ष वेधून नामदार विखे यांना पक्षाचे काम करण्याबाबत समज द्यावी असे सांगितल्याची चर्चा असून त्यानुसार उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री फडणवीस यांनी विखे यांच्याशी चर्चा करून युती धर्म पाळण्याची सूचना केली होती. त्यानंतर लगेच विखे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संपर्क करुन भाऊसाहेब कांबळे यांचे काम करण्याचा आदेश दिला.
- सुखाचे दिवस संपलेत, आता संकटाचा काळ सुरु होणार ! 16 जून 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार अडचणींच वादळ
- आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर आर्मी जवानांचा पगार कितीने वाढणार ? शिपाई, नाईक, हवालदार, नायब सुभेदार, सुभेदार सर्वांचा संभाव्य पगार पहा…
- MECL Jobs 2025: 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी! मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 108 जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- ‘ह्या’ वनस्पतीला म्हणतात विषारी सापांचा अड्डा ! तुमच्याही घराजवळ असेल तर आताच उपटून फेका
- महाराष्ट्रातील ‘ही’ वंदे भारत ट्रेन आता आठवड्यातील फक्त 3 दिवस धावणार ! 15 जून पासून लागू होणार नवं वेळापत्रक