श्रीरामपूर – श्रीरामपूर मतदार संघाचे भवितव्य शेती आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायाशी आहे. त्यावरच लहान मोठे व्यवसाय आणि बाजारपेठ चालते. या सर्व गोष्टींसाठी पाटपाणी हा महत्वाचा प्रश्न असून तो सोडविण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला आहे.
समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे आपले हक्काच्या पाण्यावर गदा आली असल्याने भविष्यात या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा स्थानिक आणि सत्ताधारी पक्षाचा असावा लागतो.

त्यामुळे श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाच्या भवितव्यासाठी आणि विकासासाठी भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आ.भाऊसाहेब कांबळे यांना निवडून देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आ.भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ नर्सरी, चांदेगाव, ब्राम्हणगाव भांड, करजगाव, बोधेगाव, जातप, त्रिंबकपूर, लाख, मुसळवाडी, मोरवाडी, फत्याबाद, गळनिंब, उक्कलगाव, बेलापूर खुर्द, पढेगाव,
भेर्डापूर, कारेगाव, मातापूर निपाणीवडगाव येथे आयोजित जाहीर सभांमध्ये श्री.मुरकुटे बोलत होते. त्यांचेसमवेत लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, काशिनाथ गोराणे, अभिषेक खंडागळे, भाऊसाहेब हळनोर, जि.प.सदस्य शरद नवले, भाजपाचे बबनराव मुठे, शिवसेनेचे अशोक थोरे, अरुण पाटील, सनी बोरुडे, विठ्ठलराव राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
- पोस्ट ऑफिसची गृहिणींसाठी खास बचत योजना ! एकदा पैसा गुंतवला की दर महिन्याला मिळणार ‘इतकं’ व्याज
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! कुटुंब पेन्शनच्या नियमांमध्ये आत्तापर्यंतचा सर्वात मोठा बदल, आता….
- वादळी पावसाचा मुक्काम वाढला! आता ‘या’ तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार, हवामान खात्याचा नवा अंदाज चिंता वाढवणारा
- मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय ! आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध अधिकार असतो का ? न्यायालय सांगते….
- काय सांगता ! ‘हा’ आहे भारतातील सर्वात मोठा जिल्हा, दिल्लीपेक्षा 31पट अधिक क्षेत्रफळ













