राहुरी: तालुक्याची वाट लावल्याने जनतेने तुम्हाला घरी बसवले. तुमच्या २५ वर्षांच्या सत्तेतील कर्तबगारी व माझ्या १० वर्षांतील विकासाची कामगिरी समोरासमोर ठेवून जनतेला हिशेब द्या, असे आव्हान आमदार शिवाजी कर्डिले यांनी तनपुरे यांना दिले.
उंबरे येथील सभेत कर्डिले बोलत होते. अध्यक्षस्थानी नामदेव ढोकणे होते. राहुरीची अस्मिता जिवंत ठेवा, असे भावनिक आवाहन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विधानसभा निवडणुकीत स्वत:चे घर सोडून दुसरा उमेदवार चालू शकत नाही का, असा सवाल करत गळ्यापर्यंत आल्यावर अस्मिता आठवली. जनतेच्या भावनेशी खेळणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, असे सुभाष पाटील यांनी म्हणाले.

वसंतदादा पाटलांचे शिक्षण चौथीपर्यंत होते. ते अमेरिकेत शिक्षणासाठी गेले नव्हते. मात्र, त्यांना शेती, शेतकरी, कारखानदारी समजली होती. आपल्याकडे वडिलांनी वांबोरीत काढलेला कारखाना मुलगा चालवतो. तुमचे स्वत:चे कर्तृत्व काय, असा सवालही पाटील यांनी केला.बाळासाहेब गाडे, शिवाजी सागर, ज्ञानदेव क्षीरसागर यांचीही भाषणे झाली.
- सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 2026 मध्ये 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? तज्ञ सांगतात…
- बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता धुरंधर चित्रपट ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार ! कधी रिलीज होणार चित्रपट?
- दरमहा 5,500 रुपयांची कमाई करायची आहे का ? मग पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा
- 2026 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट ! नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महागाई भत्ता इतका वाढणार
- 11 तासांचा प्रवास फक्त 4 तासात…. 35,000 कोटी रुपये खर्च, महाराष्ट्रात तयार होणार 442 KM लांबीचा नवीन एक्सप्रेस वे, मुख्यमंत्र्यांची मंजुरी













