अहमदनगर : आपल्या जागेवर रिलायंन्स कंपनीचे मोबाईल टावर बांधण्याचे आहे. त्यासाठी तुमच्या घरातील सर्व सदस्यांचे इन्सुरन्स करावयाचे असल्याचे सांगून, शिवाजी घोरपडे यांना विविध बँकांमध्ये वेळोवेळी पैसे भरायला लावून,३० लाख ३५ हजार ५३१ रूपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . याबाबत सविस्तर असे की, डॉ.शिवाजी बाबूराव घोरपडे (रा.शिराळ चिचोंडी) यांना राजीव माथूर (पूर्ण नाव माहित नाही),अमित त्रिपाठी, राजीव मल्होत्रा, राजेंद्र यादव, राजीव नारायण शर्मा,चमन अग्रवाल,निर्मल शर्मा, विशाल शर्मा (पूर्ण नाव माहित नाही).

यांनी संगनमत करून डॉ.घोरपडे यांना तुमच्या जागेवर रिलायंन्स कंपनीचे टावर बांधायचे आहे. त्यासाठी तुमच्या घरातील सर्व सदस्यांचे इन्शुरन्स उतरावा लागेल.असे सांगून घोरपडे यांना विविध बॅकांच्या खात्यात वेळोवळी पैसे भरण्यास भाग पाडले.
डॉ.घोरपडे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून ऑगस्ट २०१५ ते २० ऑगस्ट २०१९ या काळात विविध बँकाच्या खात्यात एकूण ३० लाख ३५ हजार ५३१ रूपये भरले.वरील आठ जणांनी हे सर्व पैसे काढून घेतले तसेच अद्यापही आपल्या जागेवर टावर उभे करण्याच्या कोणत्याही हालचाली होत नसल्याचे लक्षात आल्याने डॉ.घोरपडे यांना आपल्या फसवल्याचे लक्षात आले.
त्यामुळे त्यांनी याबाबत पाथर्डी पोलिसांत वरील आठजणांविरूध्द फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे.याबाबत अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पवार हे करत आहेत.
- साईबाबा संस्थानची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार !
- दूध डेअरी चालू करण्यासाठी माहेरहून १० लाख रूपये न आणल्यामुळे विवाहितेला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण
- कोणत्याही महिन्यांच्या ‘या’ तारखांना जन्मलेली मुलं असतात मम्माज बॉय ! आईला कधीच एकटं सोडत नाहीत, प्रचंड श्रीमंत होतात
- Post Office च्या 24 महिन्यांच्या एफडी योजनेत 1,00,000 रुपयाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- संगमनेर तालुक्यातील भोजापूर धरण यंदा जून महिन्यातच १०० टक्के भरलं, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण