अहमदनगर : नगर शहर विकास योजनेतील दिल्लीगेट रस्ता रुंदीकरणासाठी मनपाने प्रशासकीय सोपास्कर पूर्ण केले आहेत. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाहणी करून फोटोसेशन केले. तथापि, रस्ता रुंदीकरणाची अंमलबजावणी झालेली नाही. महापौरांनाही या रस्त्याचा विसर पडला आहे.
आयुक्तपदाचा पदभार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे असताना त्यांनी दिल्लीगेट भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्ता रुंदीकरणाकडे लक्ष केंद्रीत केले होते. मात्र, नगरकरांनी वेस पाडण्यास विरोध केला. त्यानंतर आयुक्तपदी श्रीकृष्ण भालसिंग हजर झाल्याने हा विषय मागे पडला. आयुक्त भालसिंग व महापौर बाबासाहेब वाकळे यांनी जूनमध्ये या रस्त्याची संयुक्त पाहणी केल्यानंतर पुन्हा हा विषय रडारवर आला.

पहिल्या टप्प्यात दिल्लीगेट ते चौपाटी कारंजा रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. दिल्लीगेट-चौपाटी कारंजा-जुनी महापालिका ते थेट जीपीओ चौक असा हा रस्ता ५० फुटांचा होणार आहे. अतिक्रमणांमुळे काही ठिकाणी हा रस्ता दहा ते पंधरा फुटांचाच उरला असल्याने वाहतूक कोंडी होते. पहिल्या टप्प्यातील रुंदीकरणात अडथळे ठरणाऱ्या चार-पाच इमारतींच्या मालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. उपअभियंता सुरेश इथापे यांना विचारले असता त्यांनी बाधित मालमत्ताधारकांना एफएसआय दिला जाईल, असे सांगितले.
- गडसंवर्धनासाठी ठोस पावले उचण्याचा संकल्प दिल्ली येथे छत्रपती शिवरायांना अभिवादन
- तमाशा कलावंतांसाठी सांस्कृतिक मंत्र्यांना भेटणार खासदार नीलेश लंके यांची माहिती
- Ahilyanagar News : अहिल्यानगरला झालेय काय? सिगारेट पाकीट उधार न दिल्याने दुकान पेटविले; दुसरीकडे कोयत्याने सपासप वार
- स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! आता ग्राहकांना…
- Ahilyanagar News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जामखेड बाबत मोठा निर्णय ! आ.रोहित पवार यांना धक्का, आता आ. शिंदे