संगमनेर :- शहर पोलिस ठाण्याच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढत दोघा सराईत गुन्हेगारांनी शुक्रवारी पहाटे कोठडीचे तीन गज कापून पलायन केले.
पहाऱ्यावरील पोलिसाला धक्का देत आरोपींनी मुख्य दारातून पलायन केले. आरोपींचा पाठलाग करत तासाभरात दोन्ही आरोपींना पकडत दिवस उजाडण्याआधीच पोलिसांनी आपली लाज राखली.
यापूर्वीदेखील याच कोठडीतून पिंट्या काळे नावाच्या आरोपीने पलायन केले होते. शुक्रवारी पहाटे पावणेचार ते चार दरम्यान ही घटना घडली.
विशाल दत्तात्रय तांदळे (२२, मंचर, जि. पुणे) आणि कलीम अकबर पठाण (२०, निंबाळे चौफुली, संगमनेर) हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून क्रमांक दोनच्या कोठडीत होते.
त्यांच्यासमवेत न्यायालयीन कोठडीतील आणखी अकरा आरोपी होते. कोठडीचे गज कापल्यानंतर या दोघांनीच पलायन केले. अन्य आरोपी तेथेच होते. बंदोबस्तावरील पोलिसांनी आरडाओरडा करत आरोपींमागे पळण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती तातडीने बिनतारी यंत्रणेच्या माध्यमातून गस्तीवर असलेल्या पोलिसांना देण्यात आली.
गस्तीवरील पोलिस पथकाने आरोपी पळून गेलेल्या दिशेने शोध सुरू केला. आरोपी त्यांना संगमनेर-अकोले रस्त्यावरील म्हाळुंगी नदीवरील पुलाजवळ असलेल्या काटवनात आढळले. आरोपींना जेरबंद केल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
- सोन्याच्या किंमतीत मोठा बदल ! 27 एप्रिल 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव कसा आहे ? महाराष्ट्रात कशी आहे स्थिती ? वाचा….
- 15 तासांचा प्रवास फक्त 7 तासात ! समृद्धीनंतर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक 700 किलोमीटरचा महामार्ग, ‘या’ जिल्ह्यांमधून जाणार
- महाराष्ट्र आणि पंजाबमधील 2 बँकांचे लायसन रद्द केल्यानंतर RBI ची देशातील ‘या’ दोन मोठ्या बँकांवर कारवाई ! ग्राहकांवर काय परिणाम होणार?
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय बदलले जाणार ? वाचा सविस्तर
- थोडे दिवस थांबा, वाईट काळही संपणार ! 11 मे 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, नशीबाच्या जोरावर हवं ते मिळणार