संगमनेर :- शहर पोलिस ठाण्याच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढत दोघा सराईत गुन्हेगारांनी शुक्रवारी पहाटे कोठडीचे तीन गज कापून पलायन केले.
पहाऱ्यावरील पोलिसाला धक्का देत आरोपींनी मुख्य दारातून पलायन केले. आरोपींचा पाठलाग करत तासाभरात दोन्ही आरोपींना पकडत दिवस उजाडण्याआधीच पोलिसांनी आपली लाज राखली.
यापूर्वीदेखील याच कोठडीतून पिंट्या काळे नावाच्या आरोपीने पलायन केले होते. शुक्रवारी पहाटे पावणेचार ते चार दरम्यान ही घटना घडली.
विशाल दत्तात्रय तांदळे (२२, मंचर, जि. पुणे) आणि कलीम अकबर पठाण (२०, निंबाळे चौफुली, संगमनेर) हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून क्रमांक दोनच्या कोठडीत होते.
त्यांच्यासमवेत न्यायालयीन कोठडीतील आणखी अकरा आरोपी होते. कोठडीचे गज कापल्यानंतर या दोघांनीच पलायन केले. अन्य आरोपी तेथेच होते. बंदोबस्तावरील पोलिसांनी आरडाओरडा करत आरोपींमागे पळण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती तातडीने बिनतारी यंत्रणेच्या माध्यमातून गस्तीवर असलेल्या पोलिसांना देण्यात आली.
गस्तीवरील पोलिस पथकाने आरोपी पळून गेलेल्या दिशेने शोध सुरू केला. आरोपी त्यांना संगमनेर-अकोले रस्त्यावरील म्हाळुंगी नदीवरील पुलाजवळ असलेल्या काटवनात आढळले. आरोपींना जेरबंद केल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
- एसबीआयची 24 महिन्यांची FD योजना गुंतवणूकदारांमध्ये बनली लोकप्रिय ! 4 लाखाची गुंतवणुक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- मुंबईकरांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी, मार्चअखेरीस ‘हा’ Metro मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार, तिकीट दर कसे असणार ? पहा….
- राजकीय आणि प्रशासकीय समीकरणे बदलणार ? अहिल्यानगरच्या नव्या जिल्हाधिकाऱ्यांबाबत उत्सुकता
- महाराष्ट्रातील नाशिक-अहिल्यानगर-पुणे जिल्ह्यांना जोडणारा ‘हा’ Railway मार्ग प्रकल्प पुन्हा चर्चेत ! मुंबईत मोठी बैठक, रूट पुन्हा बदलणार का ?
- ‘हे’ आहेत भारतातील टॉप 9 श्रीमंत शेतकरी, यादीतील सर्व शेतकरी आहेत कोट्याधीश !