संगमनेर :- शहर पोलिस ठाण्याच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढत दोघा सराईत गुन्हेगारांनी शुक्रवारी पहाटे कोठडीचे तीन गज कापून पलायन केले.
पहाऱ्यावरील पोलिसाला धक्का देत आरोपींनी मुख्य दारातून पलायन केले. आरोपींचा पाठलाग करत तासाभरात दोन्ही आरोपींना पकडत दिवस उजाडण्याआधीच पोलिसांनी आपली लाज राखली.
यापूर्वीदेखील याच कोठडीतून पिंट्या काळे नावाच्या आरोपीने पलायन केले होते. शुक्रवारी पहाटे पावणेचार ते चार दरम्यान ही घटना घडली.
विशाल दत्तात्रय तांदळे (२२, मंचर, जि. पुणे) आणि कलीम अकबर पठाण (२०, निंबाळे चौफुली, संगमनेर) हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून क्रमांक दोनच्या कोठडीत होते.
त्यांच्यासमवेत न्यायालयीन कोठडीतील आणखी अकरा आरोपी होते. कोठडीचे गज कापल्यानंतर या दोघांनीच पलायन केले. अन्य आरोपी तेथेच होते. बंदोबस्तावरील पोलिसांनी आरडाओरडा करत आरोपींमागे पळण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती तातडीने बिनतारी यंत्रणेच्या माध्यमातून गस्तीवर असलेल्या पोलिसांना देण्यात आली.
गस्तीवरील पोलिस पथकाने आरोपी पळून गेलेल्या दिशेने शोध सुरू केला. आरोपी त्यांना संगमनेर-अकोले रस्त्यावरील म्हाळुंगी नदीवरील पुलाजवळ असलेल्या काटवनात आढळले. आरोपींना जेरबंद केल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
- महिंद्रा कंपनी महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 1500 एकरावर उभारणार सर्वात मोठी कंपनी, 150000000000 रुपयांच्या महागुंतवणूकीची घोषणा
- ग्राहक Kia च्या ‘या’ SUV वर फिदा; विक्रीने गाठला लाखोंचा टप्पा
- रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून थेट दिल्लीसाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस
- मोठी बातमी ! EPFO कडून आता पीएफचे पैसे फक्त 8 दिवसांत Bank खात्यात; कधीपासून सुरु होणार नवीन सुविधा?
- घर खरेदीदारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय ! बिल्डर लोकांना चपराक













