कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या या तालुक्यातील घटना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- तालुक्यातील साकत कडभनवाडी येथील कैलास रामचंद्र नेमाने (वय ४२) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वत:च्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

कडभनवाडी (साकत) येथील कैलास नेमाने यांच्याकडे दोन एकर जमीन होत. पंधरा दिवसांपुर्वी अर्धा एकर जमीन विकली होती, तरीही कर्ज फिटले नव्हते काही कर्ज बॅंकेचे तर काही खाजगी सावकाराचे असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

अर्धा एकर जमीन विकूनही कर्ज बाकी होते. यामुळे गेल्या दहा दिवसांपासून ते मानसिक तणावाखाली होते. यातच आज सकाळी अकराच्या सुमारास वाडीच्या जवळ असणाऱ्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची खबर पोलिस पाटील महादेव वराट यांनी जामखेड पोलीसांना दिली. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रूग्णालयात

आणला वैद्यकीय अधिकारी डॉ संजय वाघ यांनी शवविच्छेदन केले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. नेमाने यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe