Ahmednagar News : जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिंचन विहिरी व फळबाग योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून सिंचन विहीर आणि फळबाग योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. सिंचन विहिरीसाठी चार लाख रुपये तर फळबागेसाठी दीड ते दोन लाख रुपये अनुदान दिले जाते.
यापूर्वी शेतकऱ्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागत असे. यामध्ये वेळेचा अपव्यय होत असे. तसेच आपला अर्ज कोणत्या स्तरावर प्रलंबित आहे याची माहिती लाभार्थ्यांना मिळत नसे. त्यामुळे शासनाने सिंचन विहीर व फळबाग योजनेचे अर्ज करण्यासाठी शासनाने एक अॅप तयार करण्यात आले असून,
या अॅप च्या माध्यमातून लाभार्थ्यांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज करून योजनेचा लाभ घेता येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरून अर्ज करता येणार असून
कमी वेळात अर्जपंचायत समितीकडे दाखल होणार आहे. ऑनलाईन अर्जावर तात्काळ कार्यवाही केली जाणार असून, अर्जाची सद्यस्थिती लाभार्थ्यांला समजणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी पोळ यांनी दिली आहे.