अहमदनगर शहरात मनसे आक्रमक : एसटीवर चिटकविले ‘ते’ फलक !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्­न गाजत असतांना आज नगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने औरंगाबादला जाणाऱ्या एस.टी.बसवर छत्रपती संभाजीनगर नावाचे फलक चिटकविण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, अनिकेत शियाळ, संकेत जरे, सुमित शिर्के, हामजा शेख, दिपक मगर, योगेश चंगेडिया, प्रमोद जाधव आदिंसह मनसे विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.याप्रसंगी सुमित वर्मा म्हणाले,

औरंगाबादच्या नामांतरणाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत केंद्र व राज्य सरकारही बोटचेपीची भुमिका घेत आहे. नागरिकांच्या भावनांचा विचार करता संभाजीनगर  हे नाव होणे गरजेचे आहे.

आज अनेक योजनांना, चौकांना सत्ताधारी व विरोधक आपआपल्या नेतृत्वाचे नाव देत आहेत,परंतु नागरिकांच्या भावनांचा आदर करुन ‘छत्रपती संभाजीनगर’ हे नामांतर होणे गरजेचे आहे.

याबाबत मनसेने वेळोवेळी पाठपुरवठा केला परंतु त्याबाबत कोणताही निर्णय होत नाही. म्हणून आज नगरमध्ये औरंगाबादला जार्णा­या गाड्यांवर ‘छत्रपती संभाजीनगर’ नावाचे फलक चिकटविले आहेत.

याची दखल घेऊन लवकरात लवकर नामांतर व्हावे, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी सुमित वर्मा यांनी दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News