अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयके रद्द करावे. या मागणीसाठी पंजाब व हरियाणा येथील शेतकर्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला छात्रभारती संघटनेने पाठिंबा दर्शवत आज (बुधवार ता.2) संगमनेर बसस्थानकासमोर आंदोलन केले.
पंजाब व हरियाणामधील शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. परंतु केंद्र सरकार लाठीचार आणि दडपशाही करुन खोटे गुन्हे नोंदवून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहे.

याचा निषेध करुन छात्रभारती विद्यार्थी संघटनेने जोरदार निषेध करुन आंदोलन छेडले आहे. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्त्या निशा शिवूरकर,
अॅड.नईम इनामदार, हिरालाल पगडाल, छात्रभारतीचे राज्य उपाध्यक्ष अनिकेत घुले, जिल्हा कार्याध्यक्ष तुषार पानसरे, प्रशांत काकड यांनी आंदोलनात भूमिका मांडली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved