राहुरी : मनमाड-नगर रस्त्यावर चौधरी ढाब्यासमोरून पुढे जाताना ट्रक (क्र. एमएच ११ एम ५७५९) वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून अविचाराने हयगयीने रस्त्याच्या उजव्या लेनवरून अचानक कोणतीही इंडिकेटर न देता व पाठीमागील वाहन न पाहता अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला लेनवर घेऊन एकदम ब्रेक मारला.
त्याच्यावेळी पाठीमागून येणाऱ्याने हुंदाई कार (क्र. एमएच १४ सीसी ४१३८)ने ट्रकला पाठीमागून धडक दिली. यात कारचालक सुजित जयसिंग मगर (वय ३२, रा. मठवस्ती, पळवे सुपा एमआयडीसी, ता.पारनेर) हेा गंभीर जखमी झाले. औषधोपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दि. ११ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली.

याप्रकरणी अति जयसिंग मगर (वय २९, रा. फोर्जिंग कॉलनी, वडगाव गुप्ता, एमआयडीसी अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक राजेंद्र हरी वामन (रा.कोकणगाव, ता.संगमनेर) याच्याविरूद्ध राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! पुणे-दानापुर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनला राज्यातील ‘या’ स्थानकावर थांबा मंजूर करण्याची मागणी
- Explained : कोपरगाव काळे-कोल्हे ‘एक्सप्रेस’ पुन्हा धावणार ? कोपरगावात बिनविरोध निवडणूक होईल …
- महाराष्ट्राला लवकरच मिळणार आणखी एक नवा रेल्वे मार्ग ! ‘या’ भागात विकसित होणार 491 कोटी रुपयांचा नवा रेल्वे प्रकल्प
- फिल्मस्टार प्रसिद्धीसाठी धारण करतात ‘हे’ रत्न; किंमतही एवढी की, सामान्यांनाही परवडते
- ‘या’ छोट्या प्रयोगाने समजते तुम्ही आणलेल पनीर खरे आहे की भेसळ? फुकटात होऊ शकतो प्रयोग