राहुरी : मनमाड-नगर रस्त्यावर चौधरी ढाब्यासमोरून पुढे जाताना ट्रक (क्र. एमएच ११ एम ५७५९) वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून अविचाराने हयगयीने रस्त्याच्या उजव्या लेनवरून अचानक कोणतीही इंडिकेटर न देता व पाठीमागील वाहन न पाहता अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला लेनवर घेऊन एकदम ब्रेक मारला.
त्याच्यावेळी पाठीमागून येणाऱ्याने हुंदाई कार (क्र. एमएच १४ सीसी ४१३८)ने ट्रकला पाठीमागून धडक दिली. यात कारचालक सुजित जयसिंग मगर (वय ३२, रा. मठवस्ती, पळवे सुपा एमआयडीसी, ता.पारनेर) हेा गंभीर जखमी झाले. औषधोपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दि. ११ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली.

याप्रकरणी अति जयसिंग मगर (वय २९, रा. फोर्जिंग कॉलनी, वडगाव गुप्ता, एमआयडीसी अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक राजेंद्र हरी वामन (रा.कोकणगाव, ता.संगमनेर) याच्याविरूद्ध राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- महिंद्रा कंपनी महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 1500 एकरावर उभारणार सर्वात मोठी कंपनी, 150000000000 रुपयांच्या महागुंतवणूकीची घोषणा
- ग्राहक Kia च्या ‘या’ SUV वर फिदा; विक्रीने गाठला लाखोंचा टप्पा
- रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून थेट दिल्लीसाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस
- मोठी बातमी ! EPFO कडून आता पीएफचे पैसे फक्त 8 दिवसांत Bank खात्यात; कधीपासून सुरु होणार नवीन सुविधा?
- घर खरेदीदारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय ! बिल्डर लोकांना चपराक













