धुळे : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची वाटचाल पराभवाकडे होत आहे. पराभवाचे खापर आपल्या माथी फुटू नये म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी बँकॉकला निघून गेले आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने आपल्या सत्ता काळात जनतेशी खोटारडेपणा केला. विकासाला खरी दिशा पंतप्रधान मोदींनी दिली आहे, असेही ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ धुळे जिल्ह्यात शिरपूर, साक्री आणि नेर येथे बुधवारी झालेल्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. त्यांनी या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले, काँग्रेस पक्ष १५ वर्षांत जे करू शकला नाही, ते युती सरकारने अवघ्या ५ वर्षांत करून दाखवले. गेल्या ५ वर्षांत केंद्र व राज्यातील सरकारवर विरोधक एकही भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध करू शकले नाहीत.

महाराष्ट्रात ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असून शेवटच्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत कर्जमाफी योजना बंद केली जाणार नाही. आघाडी सरकारने सिंचनातून आपली तिजोरी भरली. पण युती सरकारने जलयुक्त शिवार अभियानासह विविध योजना राबवून राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण केले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची वाटचाल पराभवाकडे होत आहे. पराभवाचे खापर आपल्या माथी फुटू नये म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी बँकॉकला निघून गेले आहेत.
- शालेय विधार्थी आणि पालक इकडे लक्ष द्या ! पुढील वर्षीच्या शैक्षणिक वर्षात झाला ‘हा’ बदल
- इंडसइंड बँकेतील ठेवीदारांचे पैसे बुडणार का ? बँकेतील जमा रक्कम सुरक्षित आहे का ? RBI ने दिली मोठी माहिती
- महाराष्ट्रातून धावणाऱ्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसला अतिरिक्त थांबा मंजूर !
- पुणे अन पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्वाची बातमी, दापोडी ते निगडी नंतर आता ‘या’ भागापर्यंत सुरु होणार मेट्रो !
- Ahilyanagar News : साखरपुडा तोंडावर, त्याआधीच कर्ता मुलगा गेला ..! आईवडिलांनी त्याचे अवयदान करत अनेक कुटुंबाना दिली नवसंजीवनी, अहिल्यानगरमधील कहाणी