अहमदनगर : मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या आदेशानुसार उपायुक्त प्रदीप पठारे यांनी एकूण १८ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी काढले असून त्यामध्ये नगररचना विभागातील ९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे.
यामध्ये गणेश क्यातम (पाणीपुरवठा विभाग), सतिष दारकुंडे (घनकचरा व्यवस्थापन विभाग), श्रीकांत दरेकर (प्रभाग समिती क्रमांक १), किशोर जाधव (स्थानिक संस्था कर), प्रविण नेमाणे (सामान्य प्रशासन विभाग), सुधीर सुळ (प्रभाग समिती क्रमांक ४), जितेंद्र सासवडकर (प्रसिद्धी विभाग), संजय चव्हाण (प्रभाग समिती क्रमांक ४), अंकुश कोतकर (प्रभाग समिती क्रमांक ४) यांचा समावेश आहे.

पाणीपुरवठा विभागातील कन्हैय्या छप्पानिया, प्रसिद्धी विभागातील राजाराम मोरे, घनकचरा व्यवस्थापन विभागातील नितीन गोरे, प्रभाग समिती क्रमांक १ चे सुनिल खलचे, प्रभाग समिती क्रमांक ४ चे कृष्णा साळवे, दिनेश बारनौक, स्थानिक संस्था करचे राजेश लवांडे, सामान्य प्रशासन विभागातील दत्तात्रय ढवळे, प्रभाग समिती क्रमांक ३ मधील राजेंद्र खडतरे या ९ जणांची नगररचना विभागात बदली करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना तातडीने पुर्वीच्या विभागातून कार्यमुक्त करत नवीन विभागात रुजू होवून कामकाज पाहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- समृद्धी महामार्गापेक्षा अधिक लांबीचा इंदूर-हैदराबाद Expressway महाराष्ट्रातील ‘या’ गावांमधून जाणार ! पहा सम्पूर्ण रूट
- मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, Missing Link प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! प्रकल्पाचा फायदा नेमका काय?
- माफीयाराजला पाठबळ.. ठेकेदारी पोसली..! संगमनेरात जुंपली, आ. खताळ यांनी आता थोरातांच सगळंच काढलं
- आमदार साहेब विखेंची गुलामी करण्यापेक्षा संगमनेरच्या हिताचा विचार करा
- लोकांचे प्रश्न, थेट कारवाई ! डॉ. सुजय विखे पाटील यांच्या जनता दरबारात काय झाले ?